Friday 13 August, 2010

Monday 9 August, 2010

'आता बस्स...एकीची वज्रमुठ करुन इतिहास घडवू'

खालील लेख हा इसकाळ मधून घेतला आहे. हाच लेख इसकाळवरुन वाचण्यासाठी इथे क्लिक करा!


"आता बस्स झाले. खूप अन्याय सहन केला. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राची भूमी परत मिळविण्यासाठी आता एकत्र येवू या..,एकीची वज्रमुठ करुन इतिहास घडवू' या असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे केले. 

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हजारो सीमाबांधवाच्या उपस्थीत येथील पेटाळा मैदानावर झालेल्या विराट सभेत निर्णायक लढ्याचे रणशिंग श्री ठाकरे यांनी परिषदेत फुंकले. यावेळी जमलेल्या हजारो सीमाबांधवांनी त्यांना साथ देण्याचा नारा दिला. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. या इतिहासात आपल्याला करंटे नामर्द असे हिणवून घ्यायचे नसेल, तर दुही संपवून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आपण यासाठी एकत्र येवून शेवटपर्यंत लढू या अशी शपथ श्री ठाकरे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी दक्षिण महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काहीशा मरगळलेल्या सीमालढ्याला या परिषदेने पुन्हा एक नवचैतन्य दिले.

हक्क असून अन्याय सहन करणे दुर्देवी असल्याचे सांगत श्री. ठाकरे म्हणाले,"" दिल्लीतील नामर्द केंद्र सरकार काहीही करु शकत नाही. केंद्रात गेलेले मुर्दाड खासदार दिल्लीत जावून मुडद्यासारखे वागताहेत. त्यांना जागे करण्याची गरज आहे. सीमाभागातील मराठी बांधवावर अन्याय करणाऱ्या कन्नडीगांना असा टोला द्या की त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजेत. यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनाप्रमुखांनी आदेश दिल्यास आम्ही बेळगाव कशाला बेंगलोर, दिल्लीलाही या प्रश्‍नी धडक मारु अशी घोषणा श्री ठाकरे यांनी यावेळी केली. शौर्याचा आव आणणारे राज्य सरकार शेतकऱ्यांना दंडुके देते. त्यांच्यावर बेसुमार लाठीमार केला जातो. पण याच सरकारची दंडुके; मात्र दिल्लीत गेल्यानंतर त्याच्या शेपट्या होतात. अशी टीकाही श्री ठाकरे यांनी केली.


केंद्रसरकारवरही टीकेची झोड उठविताना श्री ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारला तेलगू भाषा कळते. पण मराठी कळत नाहीत. ज्या भागात अस्सलिखीतपणे मराठी बोलले जाते. कानडीचा स्पर्शही नाही या मराठी बांधवांना जबरदस्तीने कर्नाटकात ढकलायचा डाव सुरु आहे. हे सहन करुन घेणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री हा भाग द्यायला विरोध करतात आणि मुंबईत येवून उद्योजकांना कर्नाटकात येण्याची गळ घालतात, त्यावेळी "त्या" मुख्यमंत्र्यांना शिवसेनेनेच जाब विचारला प्रत्येक वेळेला शिवसेनाच आंदोलन करते. आणि हे सरकार मात्र दुर्लक्ष करते. संसदेत शिवसेनेच्या खासदारांनीच आवाज उठवायचा बाकीचे खासदार करतात काय असा सवालही श्री ठाकरे यांनी येथे केला. आजची तरुण पिढीही अपेक्षेने आपल्याकडे महाराष्ट्रात येण्याची विनंती करीत आहे. सीमाभागातील आक्रोश तुम्हाला ऐकू येवू दे, त्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी तुमच्या खुर्च्यांचा उपयोग करा असा सल्ला श्री ठाकरे यांनी यावेळी दिला. 
शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर, आमदार दिवाकर रावते,आमदार चंद्रदीप नरके, सुजीत मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदिंनी संयोजन केले. कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

किरण ठाकूरांना गप्प बसविले...
बेळगावच्या तरुण भारचे संपादक किरण ठाकूर यांना आज सीमा वासियांच्या प्रचंडरोषास सामोरे जावे लागले. या परिषदेत ते बोलण्यासाठी उभे राहताच त्यांना एक शब्दही बोलू न देता, खाली बसविले गेले. सीमा चळवळीत फूट पाडून स्वतःचे वर्चस्व ठाकूर निर्माण करत असल्याची टीका अनेकांनी केरून संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच परिषदेतील ठराव मांडत असतानाही किरण ठाकूर सोडून सर्व मंजूर अशी घोषणाबाजी झाली. 


परिषदेत काही ठराव मंजूर करण्यात आले. ते असे
१) महाराष्ट्राने एक नोव्हेंबर २०१० हा दिन काळा दिन म्हणून राज्य भर पाळावा. या दिवशी महाराष्ट्र बंद ठेवून या प्रश्‍नांची जाण करुन द्यावी.
२) शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या लढ्यात किमान पाच लाख मराठी बांधव सहभागी होतील असे प्रयत्न करावेत.
३) कर्नाटकी पोलिस मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. हे रोखण्यासाठी केंद्रीय पोलिस पथक सीमाभागात ठेवावे.
४) सरकारी पत्रके, शेतकऱ्यांचे सातबारे व अन्य कागदपत्रे मराठी भाषेत देण्यात यावीत. तसा आग्रह केंद्राने करावा
५) शिवसेना संसदीय समिती स्थापन करावी
६) शिवसेना खासदारांनी बैठका घेवून महाराष्ट्रातील इतर पक्षाच्या खासदारांना हा प्रश्‍न समजावून सांगावा. व त्यांना लढण्यास प्रवृत्त करावे
७) केंद्राच्या अन्यायी भूमिकेचा या परिषदेत निषेध करावा. 

Wednesday 4 August, 2010

मलेरियाविरोधात शिवसेना झटतेय बाकी बडबड करताहेत!



मलेरियाने महाराष्ट्रात धुमाकुळ घातलेला आहे.  मुंबईत हजारो रुग्ण हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत, जुलै महिन्यात ११ जणांनी प्राण गमावला आहे. मुंबई महानगर पालिका प्रशासन दररोज प्रतिबंधक उपाय करत असल्याचे सांगत आहेत. तरीही मलेरियाचा प्रादुर्भाव कमी मात्र होत नाही.

मुंबईत खास करुन परळ-वरळी या विभागात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आलेले आहे. याच विभागात सर्वत्र बांधकाम सुरु आहे. बांधकामाच्या कामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात मलेरियाच्या डासांना पोषक ठरत आहेत. दुसरीकडे मलेरियावरुन राजकिय वातावरणसुद्धा तापलेले आहे. कोणाला परप्रांतियांमुळे मलेरिया वाढलेय असे वाटतेय कोणी शिवसेनेला यासाठी जबाबदार धरत आहे!

मुंबई महानगर पालिका प्रशासन याला जबाबदार आहे यात शिवसेनेचा काय दोष असू शकतो? महानगरपालिकेचे प्रशासन हे शेवटी राज्यसरकारनेच नेमलेले असते. शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असल्याने शिवसेनेला त्रास देण्यासाठी सरकार असे ढिम्म आयुक्त नेमते का? आणि शिवसेनेमुळे जर मलेरिया वाढत आहे असे काहींना वाटत असेल तर त्यांनी इकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे कारण  मलेरियावर सर्वात जास्त काम आज कोणी करत असेल तर ती शिवसेना आणि शिवसेना कार्यप्रमुख! 

शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी मागिल रविवारी मुंबईच्या अनेक महानगरपालिका रुग्णालयांना भेटी दिल्या तेथील रुग्णांची चौकशी केली. परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वीच श्री. उद्धवसाहेबांनी ’महाराष्ट्र देशा’ या पुस्तक विक्रितून येणारी रक्कम हि मलेरिया रुग्णांच्या औषधासाठी वापरणार असल्याची घोषणा केली.

कालच शिवसेना भवन येथे डॉक्टरांची बैठक घेऊन मलेरियाविरोधात अ‍ॅक्शनप्लान तयार केलेला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट, एसआरएल, मेट्रोपॉलीज लॅब, आदी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मलेरियाच्या संकटापासून शहराला वाचविण्यासाठी या सर्व संस्थांनी आपापल्या परीने पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सर्व संस्थांनी त्यासाठी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुग्णसेवा करण्याची तयारी दाखविली.

शिवसेनेच्या माध्यमातून या सर्व संस्था मुंबईतील सात वॉर्डांत प्रत्येकी 5 नर्सिंग होम सुरू करणार आहेत. या ठिकाणी अगदी नाममात्र दरांत रक्त तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अन्य तपासणी 50 टक्के सवलतीत केली जाणार आहे. याशिवाय जेथे लॅबची गरज असेल तेथे जाऊन डॉक्टरांचे पथक रक्ताचे नमुने गोळा करणार आहे. अशा प्रकारच्या दहा हजार स्लाइडस् तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

एवढे सगळे शिवसेना करत असतानाही यासाठी शिवसेना जबाबदार म्हणणारे किंवा इतर नुसती बडबड करणारे काय करत आहेत, हाच मोठा प्रश्न आहे.

Saturday 31 July, 2010

’महाराष्ट्र देशा’ सामाजिक चळवळ


अख्ख्या जगाला आकाशातून महाराष्ट्र दाखविणारा ’महाराष्ट्र देशा’ या विक्रमी विक्री झालेल्या छायाचित्र पुस्तकाच्या माध्यमातून आलेली रक्कम ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत आणि मुंबईत मलेरिया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या औषधांसाठी खर्च केले जातील असे शिवसेना कार्यप्रमुख श्री. उद्धवसाहेबांनी आज जाहिर केले.

’महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक कसे बनले? याचा उलगडा आज उद्धवसाहेबांनी रविंद्र नाट्यमंदिर येथील प्रकट मुलाखतीत दिला. विक्रमी मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांनी उद्धवसाहेबांना तसेच या सर्व प्रवासात त्यांना साथ देणाऱ्या सवंगड्यांना नुसते बोलते केले नाही तर छायाचित्रणाच्या दरम्यान घडलेल्या श्वास रोखून धरणारे आणि अंगावर रोमांच उभे राहणाऱ्या प्रसंगाचे अनुभव सांगितले.

वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो असेच उद्धवसाहेबांच्या बाबतीत म्हणता येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब संपूर्ण आयुष्य वाघाप्रमाणेच जगले त्याच प्रमाणे उद्धवसाहेबांनीही वाघाच्या काळजाने अतिशय थरारक पद्धतीने केलेले छायाचित्रण ’महाराष्ट्र देशा’ पुस्तक रुपाने जगासमोर आणले.

प्रत्येक मराठी माणसाच्या घरी हा मराठी मुलाखाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांचा मौल्यवान ठेवा असायलाच हवा, नव्हे तर मराठी माणसाने त्याच पध्दतीने आपल्या घरी जपण्याचा जणू विडाच उचलला आहे. मागच्या महिन्यात आलेल्या आकडेवारीनुसार या पुस्तकाच्या तब्बल १,७५,००० प्रती विकल्या गेल्या असून आजपर्यंत ४ आवृत्त्या निघालेल्या आहेत.

अशा या विक्रमी विक्री झालेल्या आणि होत असलेल्या पुस्तक विकत घेणाऱ्या प्रत्येक माणसाला हे पुस्तक घेऊन खुप मोठ्या समाजकार्यात सहभाग घेत असल्याचे अभिमान होणार आहे हे नक्की!

Thursday 22 July, 2010

राजू (सुपारी) परुळेकर, तुमच्या गळ्यात चपलांचा हार का घालावासा वाटतो?

पत्रकारिता लेखन म्हणजे एक जबाबदारीचे काम! एका लेखाने अनेक मने जिंकता येतात, तर अनेकांची मने दुखवता येतात. विजय तेंडूलकरांना आपले गुरु मानणारे एक आजच्या काळातील लेखक आहेत राजू (सुपारी) परुळेकर.

अनेक राजकारण्यांवर आपण लेख लिहिता. अनेक म्हणण्यापेक्षा आपले जे मित्र असतात किंवा असे म्हणा ज्यांच्या भाकरीवर आपण जगता अशांवरच म्हटले तरी हरकत नाही. ज्याचे खाता त्याचे भरभरुन कौतुक करता हे मान्य आहेच. चला तुमची ही ’लाईफ स्टाईल’च आहे ना. असो!

एकेकाळी आपण मातोश्री (होय बाळासाहेबांचे निवासस्थान) च्या पायरीवर बसत होतात, आपल्याला आठवत असेलच! होय आठवायलाच पाहिजे विसरुन कसे चालेल? कारण आताही आपण ठाकरेंच्याच पायरीवर बसलेला असता पण ते ’मातोश्री’चे नसून आता ’कृष्णकुंज’चे आहेत. हे सगळे आठवायचे आणि आपले कोडकौतुक करण्याचे कारण हेच की सध्या आपण लोकप्रभाच्या अल्केमिस्ट्री मध्ये लिखाण करता म्हणून!

Friday 18 June, 2010

दहावी निकाल मदत केंद्राला भरघोस प्रतिसाद


यंदा दहावीचा निकाल इंटरनेटवरुन जाहिर होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होणार हे स्पष्टच होते. शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे आजच्या अनुभवावरुन लक्षात आले. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांच्या सुत्रानुसार आणि वरील होणारी गैरसोय पाहता हे मदत केंद्र सुरु करण्याचे ठरले  आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रचंड गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या माध्यमातून करता आल्याने खुपच समाधान वाटले.

बारावीप्रमाणेच दहावीचा निकाल सुद्धा प्रथम इंटरनेटवरुन जाहिर करून त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष निकालाची प्रत मिळणार असल्याचे बोर्डाने जाहिर केले. यामुळे सर्वात जास्त गैरसोय राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार होती. हे निकाल शासनाच्या महसुल विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात पाहण्याची सोय शासनाने केली होती. परंतु एका वृत्तपत्रात कोकणाची आकडेवारी आली होती ती अशी, कोकणातील चार जिल्ह्यांत एकूण १३८० तलाठी व ४७ तहसिलदार असून त्यांच्या कार्यालयात इंटरनेट सुविधाच नाही. नव्हे कोकणातील या चार जिल्ह्यात अजून इंटरनेटची सोयच नाही. तर मग शासनवरील आदेश काढून काय करणार होते?

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा आजच्या संपूर्ण दिवसात एकूण ३०८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातूनच फोन करत होते. निकाल केवळ एका फोन कॉलवर मिळत असल्यामुळे अनेक जणांनी शिवसेनेचे आभार सुद्धा मानले आणि भविष्यात असेच काम करत राहाल अशी इच्छाही व्यक्त केली. 

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेने सर्वात प्रथम बारावीसाठी असेच मदत केंद्र सुरु केले आणि आता दहावीसाठी! भविष्यात सुद्धा शिव माहिती व तंत्रज्ञान सेना अशा प्रकारच्या कामात नक्कीच पुढाकार घेईल. आजच्या या कामात शिवसेना ऑर्कुट समुदायावरील प्रत्यक्ष सहभागी आणि अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या शिवसैनिकांचा हातभार लागला तो खुपच मोलाचा होता. अशा सर्व शिवसैनिकांचे आभार!