Saturday 8 November, 2008

चार वर्षे 'विलासा'ची, महाराष्ट्राच्या वनवासाची! (भाग-१)

चार वर्षे 'विलासा'ची, महाराष्ट्राच्या वनवासाची!
आघाडी सरकारच्या निष्क्रियतेवर हल्लाबोल!अस्तित्व शुन्य असलेल्या राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. या चार वर्षात वेळोवेळी सरकारची निष्क्रियता जनतेसमोर आली. या शासनाच्या नाकर्तेपणामुळे विरोधीपक्षनेते मा. रामदासभाई कदम यांनी सरकारचे वाभाडे काढणारी पुस्तिका नुकतीच प्रकाशित केली, तिच पुस्तिका जशीच्या तशी या ब्लॉगवरून सादर करत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या
गेल्या ५ वर्षात राज्यातील ४८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच घडल्या!
शेतकर्‍यांच्या कर्जमाफी पॅकेजचे श्रेय लाटणार्‍या सरकारने या आत्महत्यांची जबाबदारीही स्विकारायला हवी.

शेतकर्‍यांचा घोर अपमान
कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे वजन वाढवण्यासाठी कापसात दगड, धोंडे आणि पाणी टाकतात. असा आरोप करीत एका समारंभात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शेतकर्‍यांची टिंगल केली आणि कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळले. याच समारंभात केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री शंकरलाल वाघेला यांनी महाराष्ट्रातील शेतकरी तंबाखू चोळण्यात वेळ घालवतात, ते आळशी आहेत अशी टवाळी केली. या बेताल आरोपांमुळे आणि टिंगलीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संतप्त झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्लज्जपणे माफी मागितली.

शेतकर्‍यांची अशीही फसवणूक
शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या शेतकर्‍यांना शासनातर्फे कृषिभूषण पुरस्कार दिला जातो. परंतु पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांना देण्यात येणारे सुवर्णपदक बनावट होते. शेतकर्‍यांची हि घोर फसवणूक कशासाठी? स्वाभिमानी शेतकर्‍यांनी ही सुवर्ण पदके शासनाला परत केली. पण या निर्लज्ज आणि कोडग्या सरकारला ना खंत ना खेद! शेतकर्‍यांचा या सरकारने छळवाद चालविला आहे. नाईलाजास्तव शेतकर्‍यांना आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागला. इतकेच नव्हे तर आदिवासींच्या योजनेच्या नावाखाली बनावट मंगळसूत्र वाटण्याचे पाप या सरकारने केले.

शेतकरी विरोधी सरकार आणि काँग्रेसी नेते

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पॅकेज लाटले
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे केंद्रबिंदू असलेल्या विदर्भातील जिल्ह्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री विशेष पॅकेजचा खर्‍या लाभार्थींऐवजी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीच फायदा घेतला. पॅकेजनुसार गायी किंवा म्हशींच्या एकूण खरेदी रकमेपैकी ५० टक्के रक्कम राज्य शासनाने सोसावयाची होती. पण यवतमाळ जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसारः

* काँग्रेसचे माजी खासदार उत्तमराव पाटील व त्यांच्या नातेवाईकांनी १० गायी लाटल्या.
* दिग्रसचे विद्यमान आमदार संजय देशमुख यांची पत्नी व आई यांच्या नावे प्रत्येकी एक गाय.
* नागपूरचे माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या जवळच्या नातेवाईकाने ८ गायी 'मिळवल्या'.
* वणीचे माजी आमदार वामनराव कासावर यांच्या नातेवाईकांनी ८ गायी मिळवल्या.
* काँग्रेसचे नेते सुरेश लोणकर यांनी ६ गायी लाटल्या.
* गायींचा पुरवठा करणारे ठेकेदार अमोल क्षीरसागर हे स्वतः लाभार्थी होते. त्यांनी दोन गायी प्राप्त केल्या.
* १४००० किंमतीच्या हजारो दुभदुभत्या गायी वितरित करूनसुद्धा दुधाचा साठा कमी झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

कापूस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक
पंतप्रधानांनी विदर्भातिल शेतकर्‍यांसाठी २००० साली विशेष पॅकेज जाहिर केले. पण त्याची अंमलबजावणी मात्र धडपणे झाली नाही. उलट त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला. पंतप्रधान विदर्भाच्या दौर्‍यावर असतानाही शेतकर्‍यांचे आत्महत्यासत्र सुरूच होते.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनीच सरकारी प्रशासनाचे पितळ उघडे पाडले आहे. महालेखा परिक्षकांनी पंतप्रधान पॅकेजमधील लाभधारकांच्या मूळ आकडेवारीबाबतच शंका घेतली आहे. पंतप्रधानांनी विदर्भातील १३ लाख ४८ हजार शेतकर्‍यांसाठी ३७५० कोटी रूपयांचे पॅकेज दिले. लाभार्थींची आकडेवारीच संशयास्पद असल्याचे महालेखा परीक्षकांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांचे हे पॅकेज केवळ सहा जिल्ह्यांपुरतेच मर्यादित नव्हते. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना त्याचा फायदा मिळायला हवा होता. बँकानी ९ लाख २९ हजार प्रकरणात व्याजमाफिचा दावा करूनही ४ लाख ४५ हजार प्रकरणात नविन कर्जे देण्यात आलेले नाही. बँकांनी २८ कोटी ९५ लाख रुपयांची चुकिची कर्जमाफि दिली आहे. कारंजा कृषी अधिकार्‍यांनी ११० ऐवजी ३४९ शेतकर्‍यांना बैलखरेदीस कर्ज दिले.
इतकेच नव्हे तर एकूण लाभार्थींपैकी ८५% शेतकर्‍यांकडे शासनाचे प्रतिनिधी पोहचलेच नाहीत. शेतकर्‍यांच्या समस्यांबाबतीत महाराष्ट्र सरकार मुळीच गंभीर नाही हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकर्‍यांना खताचा वेळेवर पुरवठा झाला नाही. सरकारने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली. अखेर शेतकर्‍यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याने सरकारला जाग आली पण शेतकर्‍यांच्या अडचणींकडे सरकार मुळीच लक्ष देत नाही हे जनतेसमोर आले.

Wednesday 5 November, 2008

शिवसेना कार्याध्यक्ष मा. उद्धवजी ठाकरे यांची म.टा. मधील मुलाखत.

शिवसेनाप्रमुख पक्ष संघटनेची सुत्रे आपल्याकडे सुपर्द करतील हे अपेक्षित होते काय?
शिवसेनाप्रमुख कोणताही महत्वाचा निर्णय अनपेक्षितपणे जाहीर करतात हेच त्यांचे वैशिष्टय आहे.

कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली तेव्हाच आपण शिवसेनाप्रमुखांचे राजकीय वारस होणार हे स्पष्ट झाले होते,? शिवसेनाप्रमुखांच्या नव्या निर्णयामुळे काय फरक पडला?
सहा वर्षापूर्वी महाबळेश्वर अधिवेशनात कार्याध्यक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून आपण पक्षबांधणीचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत. निर्णय घेताना व ते राबवताना आपण आपली क्षमता व कुवत अनेकदा सिध्द करून दाखवली आहे, पण त्याचे आपण कधीच भांडवल केले नाही, तसा आपला स्वभावही नाही. पक्षाच्या दैनंदिन कारभारात अनेक निर्णय आपण घेत असलो तरी शिवसेनाप्रमुखांना विचारूनच आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण निर्णय घेत आलो आहोत. शाखा प्रमुखांची नेमणूक करतानाही येणा-या शिफारसी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने करा, असे आपले सांगणे असते. एखाद्या विषयावर प्रतिक्रिया आपण तत्काळ देऊ शकतो पण धोरणात्मक निर्णय शिवसेनाप्रमुखच घेत असतात.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारी काय झाली?

या दोन्ही निवडणुकांकडे आपण फार मोठे आव्हान म्हणन बघत नाही. लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुका असल्या तरी दोन्हीकडे मतदार एकच आहेत. दोन्ही निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळे आहेत पण केंद आणि राज्य सरकारच्या विरोधात लोकांमध्ये फार मोठा असंतोष आहे. केंदातील युपीए आणि राज्यातील लोकशाही आघाडी सरकारच्या विरोधात जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. युतीच्या काळात आम्ही साडेचार वर्षे पाच जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवले होते. गरीबांसाठी एक रूपयांत झुणका भाकर दिली. मुंबईत ५५ फ्लॉय ओव्हर उभारले. मुंबईत ट्रॅफीकची एवढी मोठी कोंडी आहे पण सरकार नाका तिथे नव्हे तर नको तिथे फ्लाय ओव्हर उभारत आहे. आम्ही वांदे चे नरिमन पॉईंट सागरी मार्ग योजना आखली. दहा वषेर् होत आली पण वरळी ते वांदे सी लिंग या सरकारला पुरा करता आला नाही. कृष्णा खोरे कामाला गती दिली, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे उभारून दाखवला. लोकांना दिलेला वचननामा अमलात आणला. उलट आमच्यानंतर आलेल्या काँग्रेस सरकारने लोकांना बाता मारल्या, लोकांची फसवणूक केली. लोकांच्या तोंडाला पाने पुसली. मुंबईतले आणि राज्यातले मोक्याच्या जागेवरील प्लॉट सोडविण्यातच देशमुख सरकार बिझी आहे. नुसते एफएसआय वाढविण्याची कामे केली. शेकडो उत्तुंग इमारती उभ्या राहत आहेत पण पाण्याचे काय? ड्रेनेजचे काय? रस्ते कुठे आहेत? मोफत वीज देता सांगून मते मिळवली पण नंतर मोफत सोडाच पण वीज नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. नंतर प्रभा राव म्हणाल्या प्रिटींग मिस्टेक होती तर विलासराव म्हणाले, निवडणुकीच्या वेळी अशा गोष्टी कराव्या लागतात. गेली चार वर्षे तर आघाडी सरकारने निव्वळ चालढकल केली.


सन २०१२ साली महाराष्ट्र विजेच्या बाबतीत परिपूर्ण असेल असे विलासरावांनी म्हटले आहे.
तेव्हा आमचे सरकार असेल. आज पाच ते सहा हजार कोटी मेगावॅटची तूट आहे पण गेल्या दहा वर्षात एक मेगा वॅट वीज निर्माण झाली नाही, त्याविषयी या सरकारला काहीच वाटत नाही. राज्यात आठ ते बारा तास लोडशेडिंग आहे, सरकारला त्याचे काही गांभीर्य वाटत नाही. लोकांना फसविण्यासाठी ते नुसते वायदे करीत वेळ काढत आहेत. खरे म्हणजे निवडणुकीत खोटी आश्वासने दिल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरायला हवा.

मुंबई मेकओव्हर ही देशमुख सरकारची जमेची बाजू आहे असे वाटते काय?

एकट्या मुंबईतून देशाला ४० टक्के प्राप्तीकर जमा होतो, यंदाच्या वषीर् १ लाख ९ हजार कोटी रू. प्राप्तीकर देशाच्या तिजोरीत या एका शहरातून जमा झाला. शिवाय सीमा शुल्क व अबकारी कर वेगळा. सर्वाधिक निर्यात मुंबईतूनच होते पण त्या बदल्यात केंद सरकार मुंबईला काय देते? दिलेल्या करापैकी २५ टक्के रक्कम मुंबईच्या विकासाला द्या, अशी आमची मागणी आहे, पण केंद मुंबईचा पैसा अन्य राज्यासाठी वापरते. मुंबई महापालिकेचे बजेट १७ हजार कोटी रू. त्यातले ७० टक्के रक्कम वेतन व प्रशासकीय कामावर खर्च होते. रूपयातील २१ पैसे विकासाला शिल्लक राहात असतील तर मुंबईचा झपाट्याने विकास कसा होणार? मुंबईला दरवर्षी २५ हजार कोटी रूपये मिळाले तरी काही कामांना गती येऊ शकते. उंच इमारतीत लोक महागडे फ्लॅट घेतात पण सर्वसामान्य माणसाला ज्या दराने पाणी दिले जाते, त्याच दराने फ्लॅटमधील लोकांना दिले जाते. लोकांनी महागडे फ्लॅट घेण्याने मुंबई महापालिकेचा किंवा मुंबईचा कोणताच फायदा होत नाही.


एमएमआरडीने मुंबईचे रंगरूप बदलले आहे असे वाटत नाही का?
मुंबईसाठी किती यंत्रणा राबवायच्या याचा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीए, म्हाडा, रेल्वे, एअरपोर्ट अॅथॉरिटी शिवाय नगरविकास मंत्रालयाचा रिमोट आहेच. एकाच यंत्रणेकडे सारी मुंबई सोपवण्याची गरज आहे.

मुंबईचा कितीही विकास केला तरी कमीच पडणार. सर्व दुखण्याचे मूळ वाढती लोकसंख्या व आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे आहे असे वाटत नाही का?
आपल्या राजधानीचा व राज्याचा विकास करणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य आहे. लालू किंवा राबडी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पंधरा वषेर् होते, पण त्या राज्याच्या विकासाची त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? पंतप्रधान महाराष्ट्रातील घटनांची गंभीर दखल घेतात तेव्हा महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या लालू यादवांना, त्यांनी त्यांच्या काळात बिहारचा किती विकास केला, किती उद्योग आणले, किती रोजगार निर्माण केला असे प्रश्न खडसावून का नाही विचारत? काँग्रेसने दरवर्षी देशात एक कोटी रोजगार देण्याचे जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते, गेल्या साडेचार वर्षात किती नोकऱ्या दिल्या, किती रोजगार दिला, हे सांगावे. घटनेचा आधार घेऊन येणारे लोंढे रोखता येणार नाहीत असे सांगितले जाते पण एवढ्या लोकसंख्येला किमान नागरी सेवा व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का? मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी होत आहे आणि उर्दू शाळांची संख्या वाढत आहे हे कशाचे लक्षण आहे?


शिवसेनेची आंदोलने थंडावली आहेत त्याचे कारण काय?

आंदोलने चालूच आहेत शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर, शेतकरी प्रश्नावर, लोडशेडिंग, महागाई, युएलसी, एसईझेड अनेक मुद्यांवर आम्ही मोर्चे काढले. जनतेच्या प्रश्नावर शिवसेनाच आवाज उठवते हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. मात्र प्रत्येक वेळी मारामा-या करून प्रश्न सुटत नाहीत. चर्चेने प्रश्न सुटतात हे आम्ही दाखवून दिले आहे. एअर इंडिया किंवा जेट एअरवेजमधील कर्मचा-यांनी आम्ही चर्चेतूनच न्याय मिळवून दिला.

दिल्लीत महाराष्ट्र सदनावर, जमशेटपूरला टाटाच्या मराठी अधिका-यांवर किंवा पाटण्यात मराठी महिला आयएएस अधिका-यांवर तेथील लोकांनी हल्ला चढवला यावर सेनेची भूमिका काय?
हे सर्व हल्ले त्या त्या प्रांतातील लोकांनी केले आहेत. अन्य प्रांतात मराठी लोकांनी घुसखोरी करून तेथील भूमिपुत्रांवर अन्याय केलेला नाही. बिहारमध्ये किंवा अन्य राज्यात मराठी लोकांना नोक-यांत प्राधान्य द्यावे अशी आम्ही मागणी केलेली नाही. प्रत्येक राज्यातील भूमिपुत्रांना प्राथमिक नोक-यांत प्राधान्य मिळाले पाहिजे. स्थानिक लोकांना अग्रक्रम देणे हे प्रत्येक राज्य सरकारचे कर्तव्य आहे. मराठी लोकांवर अन्य प्रांतात हल्ले झाले उद्या अन्य भाषिकांनाही परराज्यात त्याची झळ बसू शकेल. पंजाब, आसाम आदी राज्यात बिहारी आक्रमणाविरूध्द आंदोलने झाली. शिवसेनाप्रमुख भुमिपुत्रांचा मुद्दा १९६६ पासून मांडत आहेत तेव्हा त्यांना प्रांतवादी, संकुचित ठरविण्यात आले. आज हाच मुद्दा अन्य प्रांतात प्रखरपणे मांडला जात आहे.

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या पाठिशी शिवसेनेचे उभे राहण्याचे कारण काय?
साध्वीला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. कोणावरही संशय घ्यावा आणि तुरूंगात टाकावे ही पोलिसांची मनमानी बंद झाली पाहिजे. आमीर्तले अधिकारीही पकडले जात आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे पण पकडलेल्या लोकांसंबंधी पुरावे सापडले नाहीत तर पोलिस काय करणार आहेत? आरोप खोटे निघाले तर तु्म्ही ( सरकारने ) विष पेरण्याचे काम केले असा त्याचा अर्थ निघेल. कर्जतला दोन मुले पकडण्यात आली, लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणाचा त्यांचा संबध असल्याचा काही पुरावा मिळाला नाही. मग त्यांची बदनामी कशासाठी, त्यांना कोठडीत कशाला डांबून ठेवले? मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसमध्ये झालेल्या एन्काउंटरविषयी गळे काढणारे, दिल्लीतील बटाला हाऊसमध्य झालेल्या चकमकीत पोलिस इन्स्पेक्टर शर्माच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त करणारे कर्जतची लहान मुले पकडल्यावर गप्प का बसले आहेत ?


शिवसेनाप्रमुखांना पक्षाची संपूर्ण सुत्रे आपल्या हाती दिल्यानंतर आपल्या भूमिकेत काय फरक पडला?
मला काही शिवसेनाप्रमुख करण्यात आलेले नाही. काळानुसार नवीन पिढीकडे सुत्रे यावीत, हा बदल त्यांनी स्वीकारला आहे. मला दुहेरी जबाबदारी पार पाडायची आहे. एक म्हणजे पुत्र कर्तव्य आणि दुसरे म्हणजे पक्षकर्तव्य. कोणत्याही पित्याला आपल्या पुत्राच्या कर्तृत्वाबाबत अभिमान वाटला पाहिजे, शिवसेनाप्रमुखांना तसा अभिमान वाटेल असे काम करण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यांनी उभारलेला पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांनी आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास मला सार्थ करून दाखवायचा आहे.
मराठी मते फोडण्याच्या प्रयत्नात अमराठी मतेही काँग्रेसच्या पारड्यातून बाहेर पडत आहेत. आता त्यांनी कितीही सावरासावर केली तरी त्याचा त्यांना उपयोग होणार नाही. बॉम्बस्फोट असो, जातीय दंगे असो वा पूरपरिस्थिती असो...संकटाच्या समयी शिवसेनाच धावून येते हे मराठीच नव्हे तर अमराठींनाही चांगलेच ठाऊक आहे. अमराठी मतदारांनाही त्यांचे सण अंधारातच साजरे करावे लागतात.

Tuesday 4 November, 2008

प्रेक्षकांना उल्लू बनविण्याचा धंदा....

आजच्या सामना मधील अग्रलेख वाचला आणि कुठेतरी साहेबांनी प्रत्येकाच्या मनातील भावनाच बोलून दाखविल्यासारखे झाले. हा लेख आपण इथे क्लिक करूनही वाचू शकता. आपल्या कडच्या इलेक्ट्रॉनिक मिडियाला खरे तर इलेक्ट्रिक शॉक ट्रिटमेंट देण्याची गरज आहे. नको तिथे तोंड उघडणे हेच यांचे धंदे बनले आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ यांना म्हटले जाते. पण जिथे लोकशाहीचेच कुणाला पडलेले नाही, मग हा स्तंभही आपले काम विसरला. वास्तविक आज बरेचसे मिडियावाले हे राजकिय पक्षांना विकले गेल्यासारखेच वागत आहेत. ज्या पक्षाची हे बाजू घेतात त्याच्या विरोधकाला नेस्तनाबूत करणे हे एकमेव ध्येय्य यांचे ठरलेले आहे. सर्व सामान्यांनी कोणाचे ऐकावे हेच एक मोठे कोडे बनून राहिले आहे.

फक्त एकच उदाहरण मला द्यावेसे वाटते, कि काही दिवसांपूर्वी जेव्हा राज ठाकरे यांचे अटकनाट्य सुरू होते तेव्हा स्टार वाहिनीच्या स्टार माझा आणि स्टार न्यूज या दोन्ही वाहिन्यांवर परस्पर विरोधी बातम्या दाखविल्या जाताना असे वाटले की काय बाजार मांडला आहे या लोकांनी. राज ठाकरे यांचे दांडा (माइक) गरम होवेस्तोवर स्तुती करण्यात स्टार माझा सगळ्यांच्या १०० पाऊल पुढेच असतो. पण त्याच मालकाच्या स्टार न्यूज वर राज ठाकरे यांना गुंडा म्हटले जात होते. आता प्रेक्षकांनीच विचार करा कि यांना काय म्हणावे. एकच मालक आपला धंदा वाढावा, खुप प्रेक्षक मिळावा म्हणून असल्या मुद्द्यावर स्वताचे गल्ले भरून घेतो पण आमचा मराठी माणूस हा विचार करत नाही कि हे चॅनेलवाले आपलीच कशी वाट लावतात.

साहेबांनी आजच्या अग्रलेखामध्ये उल्लेख केलाच आहे कि, यात मराठी मालकांचे चॅनेल किती आहेत? मग हे पत्रकार लोक आपल्या मालकाला हव्या तशा बातम्या बनवतात त्या सुद्धा प्रेक्षकांना उल्लू बनवण्यासाठीच ना! तसेच आपण ज्या हिंदी न्यूज चॅनेलवर आगडपाखड करतो त्याचे पत्रकारही बरेचसे मराठीच असतात ना?मग विचार करा!

Monday 3 November, 2008

मी बाळासाहेबांची धाकटी सून

बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जास्तीत जास्त वाचायला , जाणायला लोकांना आवडतं . राजकारण , त्यांचे छंद , बाळासाहेबांची किंवा त्यांचा भाचा .. त्यांच्याशी संबधित प्रत्येक गोष्ट सतत चर्चेत असते . चर्चेत नसतात त्या रश्मी ठाकरे . शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीत असलेल्या पण दृश्यपटलावर नसलेल्या रश्मी , शिवसेनेचे युवा नेते उद्धव ठाकरे यांची ताकद असलेल्या रश्मी सांगत आहेत त्यांच्या आणि उद्धवच्या नात्याविषयी .

उद्धव ठाकरेशी माझं लग्न झालं १३ डिसेंबर १९८८ ला. त्याअगोदर दीड वर्ष आमचा साखरपुडा झाला होता . त्यादरम्यान आम्ही एकमेकांना भेटत होतो. त्यावेळी उद्धव शिवसेनेचे मुखपत्र ‘ सामना ’ काढण्याच्या तयारीत गुंतलेले होते. त्या कामासाठी मीसुद्धा त्यांच्याबरोबर जायचे. त्याचवेळी मला जाणवलं की , उद्धव अत्यंत मितभाषी आहे. संयत आणि थेट असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पारदर्शक डोळ्यात मला नेहमीच प्रामाणिकपणा दिसतो.

उद्धव यांच्या प्रत्येक गोष्टींत मी सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह असायचा. मी सहभागी झालेही मात्र , तसा माझा सहभाग कधी लोकांच्या समोर आला नाही. साखरपुड्यानंतरच दीड वर्ष कसं गेलं ते कळलंही नाही आणि एक दिवस ठाकरे घराण्याची सर्वात धाकटी सून म्हणून मी ‘ मातोश्री ’ त पाय ठेवला।

या नावाचा मोठा दबदबा आहे. तेव्हाही होता आणि आजही आहे. त्यात आजपर्यंत तरी फरक पडलेला नाही. जितके ठाकरे परिवारावर प्रेम करणारी माणसं आहेत तितकेच त्यांना विरोधकही आहेतच. जेव्हा सून म्हणून मी या घरात पाय ठेवला तेव्हा बाळासाहेबांविषयी माझ्या मनात आदरयुक्त भीती होती. असं वाटत होतं की त्यांच्या घरातलं वातावरण काही वेगळंच असेल. त्यामुळेच मातोश्रीवर प्रवेश करण्याचं मला काहीसं टेन्शनच होतं. पण , आई मीनाताई आणि उद्धव हे दोघेही मला शक्तिस्तंभासारख्याच होत्या. या घरात रुळायला त्यांनीच मला मदत केली. स्वयंपाकघरात आईंना मदत करणं , येणा-या जाणा-यांचे आदरातिथ्यं करणं , उद्धवबरोबर बाहेर जाणं या सा-यांत माझा दिवस निघून जायचा. त्यावेळी उद्धव एक जाहिरात एजन्सी चालवायचे. १९९० च्या निवडणूकांसाठीची शिवसेनेच्या प्रचाराची थीम उद्धवनेच तयार केली होती.

मी मध्यमवर्गीय कुटुंबातच राहिले वाढले आहे. त्यामुळे मला वाटतं होतं की , ठाकरे परिवारात मिसळायला मला जड जाईल. पण खरं सांगायचं तर , असं काही झालं नाही. सासरची संस्कृती आणि परंपरा या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक मुलीला थोडे बदल करावे लागतात. मी त्यांच्यात मिसळून गेले. त्यामुळेच ठाकरे परिवाराचाच एक भाग होण्यात मला काही अडचण आली नाही. त्रास झाला नाही.


आमच्या लग्नानंतर साधारण महिनाभरात बाळासाहेबांनी ‘ सामना ’ सुरू केला. त्याची जबाबदारी उद्धववर देण्यात आली. मी फ्कत त्याला सोबत म्हणून त्याच्याबरोबर जायचे. आवृत्ती निघेपर्यंत आम्ही तिथे थांबायचो. सामनाशी आमचं जवळंच नातं होतं. हळू हळू तिथे शिवसैनिकांची वर्दळ सुरू व्हायला लागली. उद्धव त्यांना भेटायला लागले. ओळख वाढत गेली. अजाणताच उद्धव यांच्या राजनैतिक वाटचालीची सुरवात झाली आणि मी त्यांच्या सोबत राहिले।

आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. खूप. सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यात इतका एकटा असत नाही जितका ते राजकारणात एकटा असतो. राजकारणात उतार - चढाव , ऊन-सावली , आनंद- दु : ख अशा अनेक स्थित्यंतरांमधून जावं लागतं. या सा-या बदलांमध्ये नव-याला ताकद द्यायची जबाबदारी बायकोला घ्यावीच लागते. ती ताकद बनण्याचा मी प्रयत्न करते. स्वत : उद्धव खंबीर आहेतच. घरातलं शेंडेफळ असूनही मीनाताईंचं निधन आणि मोठा भाऊ बिंदा याचा अचानक मृत्यूनंतर वडिलांना उद्धवनेच सावरले. विस्कळीत झालेलं घरही त्यांनी पूर्वपदावर आणले. कितीही कठीण परिस्थितीत न डगमगणं आणि विनोदबुद्धी शाबित ठेवणं या त्यांच्या गुणांवर मी फिदा आहे।

एकदा कसलीतरी अडचण घेऊन एक बडे उद्योगपती आले होते. त्याने सहज बोलताना सांगितले की , सध्या परिस्थिती मोठी कठीण आहे. आम्हाला परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करायला लागतेय. त्यावर हजरजबाबीपणे उद्धव लगेच उत्तरले , तुम्हालाच का आम्हालाही परदेशी व्यक्तिंशी स्पर्धा करायला लागते आहे. उद्धवचा इशारा त्यावेळी सोनिया गांधींकडे होता. त्यांच्या विनोदी स्वभावाचे असे अगणित किस्से आहेत.


ठाकरे परिवारातल्या अनेकजणांचा स्वभाव असा विनोदी आहे. विशेषत : बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवरील टिप्पणी ऐकणे आणि वाचणे अनेकांना आवडते. ठाकरे परिवारातल्या व्यक्तिंचे पशु , पक्षी आणि झाडांवर मनापासून प्रेम आहे. जेव्हा मी लग्न होऊन या रात आले तेव्हा घरात तीन ग्रेट डॅन कुत्रे होते. आता फक्त एक कुत्रा आहे. फिश टँकमध्ये रंगीबिरंगी मासे होते आणि कुंड्यांमध्ये झाडे होती. उद्धवला जंगलात फिरायला आवडतं. ड्रायव्हिंग आणि फोटोग्राफी या गोष्टींवर त्यांचं बेहद प्रेम आहे. त्यांना वेळ मिळाला की ते मला लाँग ड्राइव्हवर घेऊन जातात. तेव्हा फक्त आम्ही दोघेच असतो. जबाबदारी वाढल्यापासून अर्थातच आता असे क्षण कमीच वेळा वाट्याला येतात..
ठाकरे परिवार आस्तिक आहे , पण घरात पूजा-पाठ केले जात नाहीत. बाळासाहेब सकाळी काही तास १५ ते १६ पेपर वाचतात. काही लेख आणि बातम्यांना अंडरलाइन करून ते उद्धवकडे पाठवतात. त्यांनी वाचावं म्हणून. माझ्या मुलांनी किंवा मी वाचावं असं काही असेल तर ते आमच्या रूमपर्यंतही येतच. ते इतके शिस्तीचे आहेत की , अव्यवस्थितपणा त्यांना अस्वस्थ करतो.

लहान-सहान आजारांसाठी त्यांना अॅलोपथीच्या गोळ्या घ्यायला आवडत नाही. होमिओपथीचे उपचार घेण्याकडेच त्यांचा अधिक कल असतो. बाळासाहेबांचे खाणे अगदीच कमी आहे आणि खाण्यासाठी त्यांनी कधी काही फर्माइश केलेली मी ऐकलेली नाही. सध्या तर ते खूपच कमी आहार घेत आहेत. त्यांच्या नातवांच्या बाबतीत तर ‘ आज्जा ’ खूपच संवेदनशील आहे. थोडासा पाऊस पडत असला तरी ते मला विचारतात की , आज या मुलांना शाळेत पाठवणं गरजेचं आहे का ? ‘ नातवांसाठी पुस्तकं आणणं त्यांना सर्वाधिक आवडतं काम आहे.


बाळासाहेब ठाकरे या नावाच्या ताकदीचा मी कित्येकदा अनुभव घेतला आहे. एकदा आम्ही अमेरिकेच्या ट्रीपला गेलो होतो. तिथे आमचे इमिग्रेशनचे पेपर तपासणारी महिला अमेरिकन भारतीय होती. उद्धवचे पेपर तपासताना तिने उद्धव बाळ ठाकरे असं नाव पाहिलं आणि ती एकदम चकित झाली. तिने आमच्याकडे बाळासाहेबांविषयी विचारपूस केली आणि आमची तपासणी केल्याशिवायच आम्हाला जाऊ दिले. असे अनेक प्रसंग मला सांगता येतील. मात्र आम्ही कधीही या गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही. माझी मुलं सामान्य मुलांप्रमाणेच शाळेत जातात. मी सुद्धा खरेदीसाठी कोणत्याही बाजारात जाते. पार्ल्याच्या बाजारातल्या कोळीणींशी गप्पा मारायला मला आवडतं.

वीस वर्ष हा खूप मोठा काळ आहे. विशेषत : ज्या कुटुंबावर सतत नजरा रोखलेल्या असतात अशा कुटुंबासाठी तर तो निश्चितच मोठा काळ आहे. शिवसैनिकांसाठी मातोश्री एखाद्या श्रद्धास्थानापेक्षा कमी नाही. दिवस-रात्र लोकांचे जाणे-येणे असते. नवीन लग्न होऊन आले तेव्हा मी मातोश्रीवर शिवसैनिकांचे , अन्य पक्षांच्या नेत्यांचे , कितीतरी बड्या मंडळींचे जाणे-येणे पाहिले आहे. एका परिवाराशी , कुटुंबाशी समरस झालेला शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेनेची बांधणी , जडण-घडण आणि विस्तार सारे काही ठाकरे परिवाराशी जोडलेले आहे. ठाकरे आणि शिवसेना दुधात साखरेसारखे मिसळलेले आहे. आमचे घरदेखील पक्षाच्या कार्यालयासारखेच आहे.


मीनाताई किती प्रेमाने शिवसैनिकांचे स्वागत करायची ते मी पाहिले आहे. त्या त्यांचे सुख-दु : ख समजून घ्यायच्या. त्यांच्या घरातली पूजा , लग्न अशा अनेक प्रसंगांना त्या उपस्थित असायच्या. शिवसेनेत नसूनही त्या शिवसेनेचा मोठा हिस्सा होत्या. या नात्याला तुम्ही काय म्हणाल ? काय तुम्ही असं म्हणाल की , त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा मोह होता. हे सारं त्या राजकारणात सामिल होण्यासाठी करत होत्या ? मी पण तेच करतेय ज्याची ठाकरे कुटुंबाला गरज आहे. कोणी याला राजकारण म्हणू दे किंवा राजकीय महत्वकांक्षा. मला त्याने फारसा फरक पडत नाही.


काहीजणांनी उद्धवच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. जसं काही फोटोग्राफी करणं हा गुन्हाच आहे. ठाकरे परिवाराला कलेची देणगीच आहे. बाळासाहेब कार्टूनिस्ट आहेत. उद्धव यांना फोटोग्राफीची आवड आहे. खूप कमीजणांना माहितेय की ते सुंदर पेंटिंग्जही काढतात. आमचा मोठा मुलगा आदित्य कविता करतो. छोट्या तेजसला पशु-पक्षी यांची आव़ड आहे. त्याच्याजवळ पशु-पक्ष्यांची माहिती देणारी २०० ते ३०० पुस्तकं आहेत. आम्ही सिंगापूरला प्राणीसंग्रहालय पाहायला गेलो होतो तेव्हा त्याने प्रत्येक प्राण्याविषयी आम्हाला पूर्ण माहिती दिली होती. मुंबईतल्या झाडांविषयीची त्याची माहिती विस्मय करायला लावणारी आहे. जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो तेव्हा उद्धव आणि तेजस निसर्गात हरवून जातात. विमानप्रवासात मुलं उद्धव यांच्याकडून पेंटिंग्ज करवून घेतात. तेव्हा आम्ही अगदीच वेगळ्या जगात असतो आणि असे दौरे मला फार आवडतात. पण..ते लवकरच संपतात आणि आम्ही ‘ मातोश्री ’ च्या जगात परत येतो.


संकट येवोत किंवा आनंदाचे क्षण , उद्धव दोन्ही परिस्थितीत सामान्याप्रमाणेच असतात. त्यांची तटस्थता मला एखाद्या संतासारखी वाटते. मागच्या वर्षीची पालिकेची निवडणूक उद्धवसाठी अग्निपरिक्षेसारखीच होती. आपल्याच लोकांनी केलेले प्रहार , राजनैतिक लोकांनी केलेले आणि मोठाल्या आव्हानांनी घेरलेलं असतानाही त्यांनी यश खेचून आणलं. त्यांच्यासाठी यापेक्षा मोठा आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असू शकत नाही. पण शिवसेनेत मोठी फूट पडली तेव्हा उद्धव जितके शांत होते तितकेच शांत ते तेव्हाही होते।

मालवण आणि राजापुरमधील विधानसभा उपनिवडणुका हरल्यानंतर शिवसेनेत कमालीची मरगळ होती. हताशपणा होता. तो काळच वाईट होता. चारी बाजूंनी उद्धववर वार होत होते. मीडियातूनही त्यांच्या क्षमतेबाबत शंका व्यक्त केली जात होती. कोणतीच चांगली गोष्ट ऐकायला मिळत नव्हती. ‘ शिवसेना जिंदाबाद ’ असं ऐकायला माझे कान अगदी आसुसले होते. म्हणूनच श्रीवर्धनची उपनिवडणूक जिंकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. रामटेक लोकसभा उपनिवडणूकांच्या विजयानेही मी भावविभोर झाले होते , पण उद्धववर त्याचा फारसा परिणाम नव्हता. हरण्या-जिंकण्यात त्यांचे फक्त डोळे बोलतात. हलक्या भु-या रंगाचे त्यांचे डोळे हा त्यांच्या मनाचा आरसाच आहे जणू ! त्यांच्या डोळ्यांतून आजपर्यंत ना कोणाविषयी द्वेष दिसलाय ना निराशा. कधीच नाही. आपल्या लोकांनी त्याच्यावर बिनबुडाचे आणि घाणेरडे आरोप केले तेव्हाही नाही।

कोणाला ऐकून खरं वाटणार नाही , पण गेल्या २० वर्षात उद्धव माझ्याशी मोठ्या आवाजात कधीही बोललेले नाहीत. कधीही त्यांनी एखाद्या गोष्टीवर त्यांची नाराजी दाखवली नाही. मुलांवरही त्यांचे खूप प्रेम आहे. उद्धव कधीही त्यांना ओरडत नाहीत. इद्धव अंतर्मुख आहे तर मी बहिर्मुख. म्हणूनच कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत. संकटात आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ असतो. वाईट काळ जाण्याची वाट पाहतो. आम्हाला माहितेय की , जगात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. आमचे त्रासही नाहीत।

याबाबत मी गेल्या तीन-चार वर्षांचा उल्लेख करेन. उद्धवच्या राजनैतिक आयुष्यात जे वादळ आले त्यामुळे बडे बडे नेतेही हलले असते. पण उद्धव जराही विचलित झाले नाहीत. बाळासाहेबांचा आदर्श तर त्यांच्याबरोबर होताच. पण सगळ्यांशी टक्कर उद्धव यांना एकट्याने द्यायची होती. त्याबाबतीत ते अगदी एकटे होते. आपल्याच लोकांनी केलेले आरोप त्यांना सहन करायचे होते. चारित्र्य हननही सहन करायचे होते. मोठा कसोटीचा काळ होता तो. उद्धवने शांत राहून वार झेलले. आरोपांना उत्तर देण्याऐवजी आत्मविश्वासाने पार्टीला पुन्हा उभे राहण्यासाठी सारी उर्जा वापरली. मी कितीतरी वेळा चिडायचे. ओरडायचे. पण ते मला सांगायचे की , आपण त्यांच्याइतकं खालच्या पातळीवर नाही उतरू शकत. जर आपण त्यांना उत्तरे दिली तर आपल्याला भडकावण्याचा त्यांचा हेतू साध्य होईल. म्हणूनच शांत राहण्यातच समजूतदारपणा आहे. खरोखरीच उद्धव खूपच परिपक्व आणि धैर्यवान आहेत. याबाबतीत त्यांच्यासारखे कोणीही नाही।

लोक मला विचारतात की , तुमच्या मुलालाही तुम्हाला राजकारणातच पाहायला आवडेल का ? यावर माझं उतर असतं उद्या कोणी पाहिलायं ? त्यांना ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जाऊ दे पण आमची इच्छा इतकीच आहे की त्यांनी चांगली व्यक्ती बनावं. आदित्य मागच्या वर्षी दहावी झाला. दहावीतही त्याला इकॉनॉमिक्स शिकवायचे. तेजस लहान आहे. त्याचा गृहपाठ मीच घेते. आदित्यच्या स्कॉटिश शाळेने एकदा साफ-सफाई मोहिम चालवली होती. त्याच्या शिक्षकांकडून मला कळलं की , पहिला झाडू आदित्यने उचलला होता. मला खूप आनंद झाला ते ऐकून. सध्या तो सेंट झेवियर्समधून पॉलिटिकल सायन्स घेऊन बी.ए करतोय. त्याच्या वागण्यातून तो बाळासाहेबांचा नातू असल्याचे कधी जाणवूनही देत नाही.

आयुष्यात मी संतुष्ट आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागतं. नावाबरोबरच जिथे प्रतिष्ठा , ओळख आणि लोकप्रियता मिळते तिथेच जबाबदा-याही स्विकाराव्या लागतात. त्याचवेळी तुमच्या स्वातंत्र्याची रेषही आखली जाते. नाव आणि प्रतिष्ठेसाठी तुम्हाला स्वत : ला काही बंधनात बांधून घेणं आवश्यक असतं. मी आपखुशीने स्वत : ला काही आवश्यक त्या मर्यादेत बांधून घेतलंय. फक्त परिस्थितीच नाही ,
तर परिस्थितीच्या आरपार पाहणेही आता शिकले आहे।

साभार - मटा. ऑनलाईन

हिंदुंनो साध्वी प्रज्ञाच्या पाठीशी उभे रहा - साहेब


राष्ट्राच्या मुळावर उठणा-या कुठल्याही दहशतवादाला आम्ही कधीच पाठिंबा दिलेला नाही. किंबहुना, अशा दहशतवादाचा निषेधच व्हायला हवं. पण मुस्लिम धर्मांधांना खुश करण्यासाठी होतकरू तरुणांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवण्याचा उफराटेपणा काँग्रेसनं चालवला आहे. अशावेळी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्या पाठीशी हिंदू समाजानं खंबीरपणे उभं राहायला हवं, असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय.

हिंदूंनी नामर्द आणि गांडू बनून जगावं आणि इस्लामी आक्रमकांनी आमच्या पिढ्याच्या पिढ्या नष्ट कराव्यात हेच काँग्रेसवाल्याचं धोरण असेल तर या तिघांचं काय चुकलं ? मुसलमानी मतांसाठी येथील राज्यकर्त्यांनी जे कृपाछत्र धर्मांधांवर धरलं आहे, ते दूर झालं तर हिंदूही आपल्या आईच्या दुधाची ताकद दाखवून देईल. देशातील बेगडी निधर्मीवाद्यांना अफझल गुरू प्यारा असेल तर आम्ही आक्रमक हिंदू तरुणांवर प्रेम का करू नये ?, अशी पाठराखण बाळासाहेबांनी ' सामना ' च्या अग्रलेखातून केली आहे.

दरम्यान, या तिघांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी शिवसेनेतर्फे मदत केली जाईल, वकील दिला जाईल, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हायजॅक केला असताना, आता शिवसेनेनं पुन्हा आक्रमक हिंदुत्वाची कास धरली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं साध्वी प्रज्ञा सिंग, समीर कुलकर्णी आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली आहे. त्यांच्या नार्को टेस्टची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून या त्रयीला पाठिंबा जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पण बाळासाहेबांनी अग्रलेखातून मुस्लिमविरोधी परखड मतं मांडली आहेत.

मालेगाव स्फोटांप्रकरणी ज्या अटका होत आहेत ते सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक आहेत. पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवलं जातंय. एटीएसवाल्यांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटांमागे खरोखरच हिंदू असतील तर त्यांच्यावर तशी वेळ का आली, याचा विचारही करायला हवा, असं बाळासाहेबांनी नमूद केलंय. आज हिंदू सर्वत्र मार खातोय तो सरकारी कृपेनं. हिंदू जरा कुठे उसळी मारू लागला की त्याला दाबता येईल तेवढं दाबायचं आणि मुस्लिम धर्मांधांना खुश करायचं. त्यांना जणू संदेशच द्यायचा की, ' बघा बघा, हिंदूंना त्यांच्याच देशात आम्ही कसे भरडतोय आणि चिरडतोय. उद्या निवडणुका आल्या म्हणजे विसरू नका. ' साध्वी प्रज्ञा, कुलकर्णी आणि मेजर उपाध्याय यांना अटक करण्यामागे नेमकं हेच कारण आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. पण हिंदूंचे रक्षण करू आणि बांगलादेशी किंवा धर्मांध पाकप्रेमी मुसलमानांना धडा शिकवू, असं कुणी काँग्रेसवाला बोलल्याचं आठवतंय का ? , असा सवाल बाळासाहेबांनी केलाय। सरकार हिंदूंच्या मागे नसेल तर, होतकरू हिंदूंच्या मागे आपणच उभं राहायला हवं आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असंही त्यांनी जाहीर केलंय.

साभार - मटा. ऑनलाईन