Friday 13 August, 2010

Monday 9 August, 2010

'आता बस्स...एकीची वज्रमुठ करुन इतिहास घडवू'

खालील लेख हा इसकाळ मधून घेतला आहे. हाच लेख इसकाळवरुन वाचण्यासाठी इथे क्लिक करा!


"आता बस्स झाले. खूप अन्याय सहन केला. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राची भूमी परत मिळविण्यासाठी आता एकत्र येवू या..,एकीची वज्रमुठ करुन इतिहास घडवू' या असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे केले. 

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हजारो सीमाबांधवाच्या उपस्थीत येथील पेटाळा मैदानावर झालेल्या विराट सभेत निर्णायक लढ्याचे रणशिंग श्री ठाकरे यांनी परिषदेत फुंकले. यावेळी जमलेल्या हजारो सीमाबांधवांनी त्यांना साथ देण्याचा नारा दिला. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. या इतिहासात आपल्याला करंटे नामर्द असे हिणवून घ्यायचे नसेल, तर दुही संपवून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आपण यासाठी एकत्र येवून शेवटपर्यंत लढू या अशी शपथ श्री ठाकरे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी दक्षिण महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काहीशा मरगळलेल्या सीमालढ्याला या परिषदेने पुन्हा एक नवचैतन्य दिले.

हक्क असून अन्याय सहन करणे दुर्देवी असल्याचे सांगत श्री. ठाकरे म्हणाले,"" दिल्लीतील नामर्द केंद्र सरकार काहीही करु शकत नाही. केंद्रात गेलेले मुर्दाड खासदार दिल्लीत जावून मुडद्यासारखे वागताहेत. त्यांना जागे करण्याची गरज आहे. सीमाभागातील मराठी बांधवावर अन्याय करणाऱ्या कन्नडीगांना असा टोला द्या की त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजेत. यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनाप्रमुखांनी आदेश दिल्यास आम्ही बेळगाव कशाला बेंगलोर, दिल्लीलाही या प्रश्‍नी धडक मारु अशी घोषणा श्री ठाकरे यांनी यावेळी केली. शौर्याचा आव आणणारे राज्य सरकार शेतकऱ्यांना दंडुके देते. त्यांच्यावर बेसुमार लाठीमार केला जातो. पण याच सरकारची दंडुके; मात्र दिल्लीत गेल्यानंतर त्याच्या शेपट्या होतात. अशी टीकाही श्री ठाकरे यांनी केली.


केंद्रसरकारवरही टीकेची झोड उठविताना श्री ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारला तेलगू भाषा कळते. पण मराठी कळत नाहीत. ज्या भागात अस्सलिखीतपणे मराठी बोलले जाते. कानडीचा स्पर्शही नाही या मराठी बांधवांना जबरदस्तीने कर्नाटकात ढकलायचा डाव सुरु आहे. हे सहन करुन घेणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री हा भाग द्यायला विरोध करतात आणि मुंबईत येवून उद्योजकांना कर्नाटकात येण्याची गळ घालतात, त्यावेळी "त्या" मुख्यमंत्र्यांना शिवसेनेनेच जाब विचारला प्रत्येक वेळेला शिवसेनाच आंदोलन करते. आणि हे सरकार मात्र दुर्लक्ष करते. संसदेत शिवसेनेच्या खासदारांनीच आवाज उठवायचा बाकीचे खासदार करतात काय असा सवालही श्री ठाकरे यांनी येथे केला. आजची तरुण पिढीही अपेक्षेने आपल्याकडे महाराष्ट्रात येण्याची विनंती करीत आहे. सीमाभागातील आक्रोश तुम्हाला ऐकू येवू दे, त्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी तुमच्या खुर्च्यांचा उपयोग करा असा सल्ला श्री ठाकरे यांनी यावेळी दिला. 
शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर, आमदार दिवाकर रावते,आमदार चंद्रदीप नरके, सुजीत मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदिंनी संयोजन केले. कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

किरण ठाकूरांना गप्प बसविले...
बेळगावच्या तरुण भारचे संपादक किरण ठाकूर यांना आज सीमा वासियांच्या प्रचंडरोषास सामोरे जावे लागले. या परिषदेत ते बोलण्यासाठी उभे राहताच त्यांना एक शब्दही बोलू न देता, खाली बसविले गेले. सीमा चळवळीत फूट पाडून स्वतःचे वर्चस्व ठाकूर निर्माण करत असल्याची टीका अनेकांनी केरून संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच परिषदेतील ठराव मांडत असतानाही किरण ठाकूर सोडून सर्व मंजूर अशी घोषणाबाजी झाली. 


परिषदेत काही ठराव मंजूर करण्यात आले. ते असे
१) महाराष्ट्राने एक नोव्हेंबर २०१० हा दिन काळा दिन म्हणून राज्य भर पाळावा. या दिवशी महाराष्ट्र बंद ठेवून या प्रश्‍नांची जाण करुन द्यावी.
२) शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या लढ्यात किमान पाच लाख मराठी बांधव सहभागी होतील असे प्रयत्न करावेत.
३) कर्नाटकी पोलिस मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. हे रोखण्यासाठी केंद्रीय पोलिस पथक सीमाभागात ठेवावे.
४) सरकारी पत्रके, शेतकऱ्यांचे सातबारे व अन्य कागदपत्रे मराठी भाषेत देण्यात यावीत. तसा आग्रह केंद्राने करावा
५) शिवसेना संसदीय समिती स्थापन करावी
६) शिवसेना खासदारांनी बैठका घेवून महाराष्ट्रातील इतर पक्षाच्या खासदारांना हा प्रश्‍न समजावून सांगावा. व त्यांना लढण्यास प्रवृत्त करावे
७) केंद्राच्या अन्यायी भूमिकेचा या परिषदेत निषेध करावा. 

Wednesday 4 August, 2010

मलेरियाविरोधात शिवसेना झटतेय बाकी बडबड करताहेत!



मलेरियाने महाराष्ट्रात धुमाकुळ घातलेला आहे.  मुंबईत हजारो रुग्ण हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत, जुलै महिन्यात ११ जणांनी प्राण गमावला आहे. मुंबई महानगर पालिका प्रशासन दररोज प्रतिबंधक उपाय करत असल्याचे सांगत आहेत. तरीही मलेरियाचा प्रादुर्भाव कमी मात्र होत नाही.

मुंबईत खास करुन परळ-वरळी या विभागात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आलेले आहे. याच विभागात सर्वत्र बांधकाम सुरु आहे. बांधकामाच्या कामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात मलेरियाच्या डासांना पोषक ठरत आहेत. दुसरीकडे मलेरियावरुन राजकिय वातावरणसुद्धा तापलेले आहे. कोणाला परप्रांतियांमुळे मलेरिया वाढलेय असे वाटतेय कोणी शिवसेनेला यासाठी जबाबदार धरत आहे!

मुंबई महानगर पालिका प्रशासन याला जबाबदार आहे यात शिवसेनेचा काय दोष असू शकतो? महानगरपालिकेचे प्रशासन हे शेवटी राज्यसरकारनेच नेमलेले असते. शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असल्याने शिवसेनेला त्रास देण्यासाठी सरकार असे ढिम्म आयुक्त नेमते का? आणि शिवसेनेमुळे जर मलेरिया वाढत आहे असे काहींना वाटत असेल तर त्यांनी इकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे कारण  मलेरियावर सर्वात जास्त काम आज कोणी करत असेल तर ती शिवसेना आणि शिवसेना कार्यप्रमुख! 

शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी मागिल रविवारी मुंबईच्या अनेक महानगरपालिका रुग्णालयांना भेटी दिल्या तेथील रुग्णांची चौकशी केली. परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वीच श्री. उद्धवसाहेबांनी ’महाराष्ट्र देशा’ या पुस्तक विक्रितून येणारी रक्कम हि मलेरिया रुग्णांच्या औषधासाठी वापरणार असल्याची घोषणा केली.

कालच शिवसेना भवन येथे डॉक्टरांची बैठक घेऊन मलेरियाविरोधात अ‍ॅक्शनप्लान तयार केलेला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट, एसआरएल, मेट्रोपॉलीज लॅब, आदी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मलेरियाच्या संकटापासून शहराला वाचविण्यासाठी या सर्व संस्थांनी आपापल्या परीने पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सर्व संस्थांनी त्यासाठी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुग्णसेवा करण्याची तयारी दाखविली.

शिवसेनेच्या माध्यमातून या सर्व संस्था मुंबईतील सात वॉर्डांत प्रत्येकी 5 नर्सिंग होम सुरू करणार आहेत. या ठिकाणी अगदी नाममात्र दरांत रक्त तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अन्य तपासणी 50 टक्के सवलतीत केली जाणार आहे. याशिवाय जेथे लॅबची गरज असेल तेथे जाऊन डॉक्टरांचे पथक रक्ताचे नमुने गोळा करणार आहे. अशा प्रकारच्या दहा हजार स्लाइडस् तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

एवढे सगळे शिवसेना करत असतानाही यासाठी शिवसेना जबाबदार म्हणणारे किंवा इतर नुसती बडबड करणारे काय करत आहेत, हाच मोठा प्रश्न आहे.

Saturday 31 July, 2010

’महाराष्ट्र देशा’ सामाजिक चळवळ


अख्ख्या जगाला आकाशातून महाराष्ट्र दाखविणारा ’महाराष्ट्र देशा’ या विक्रमी विक्री झालेल्या छायाचित्र पुस्तकाच्या माध्यमातून आलेली रक्कम ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत आणि मुंबईत मलेरिया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या औषधांसाठी खर्च केले जातील असे शिवसेना कार्यप्रमुख श्री. उद्धवसाहेबांनी आज जाहिर केले.

’महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक कसे बनले? याचा उलगडा आज उद्धवसाहेबांनी रविंद्र नाट्यमंदिर येथील प्रकट मुलाखतीत दिला. विक्रमी मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांनी उद्धवसाहेबांना तसेच या सर्व प्रवासात त्यांना साथ देणाऱ्या सवंगड्यांना नुसते बोलते केले नाही तर छायाचित्रणाच्या दरम्यान घडलेल्या श्वास रोखून धरणारे आणि अंगावर रोमांच उभे राहणाऱ्या प्रसंगाचे अनुभव सांगितले.

वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो असेच उद्धवसाहेबांच्या बाबतीत म्हणता येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब संपूर्ण आयुष्य वाघाप्रमाणेच जगले त्याच प्रमाणे उद्धवसाहेबांनीही वाघाच्या काळजाने अतिशय थरारक पद्धतीने केलेले छायाचित्रण ’महाराष्ट्र देशा’ पुस्तक रुपाने जगासमोर आणले.

प्रत्येक मराठी माणसाच्या घरी हा मराठी मुलाखाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांचा मौल्यवान ठेवा असायलाच हवा, नव्हे तर मराठी माणसाने त्याच पध्दतीने आपल्या घरी जपण्याचा जणू विडाच उचलला आहे. मागच्या महिन्यात आलेल्या आकडेवारीनुसार या पुस्तकाच्या तब्बल १,७५,००० प्रती विकल्या गेल्या असून आजपर्यंत ४ आवृत्त्या निघालेल्या आहेत.

अशा या विक्रमी विक्री झालेल्या आणि होत असलेल्या पुस्तक विकत घेणाऱ्या प्रत्येक माणसाला हे पुस्तक घेऊन खुप मोठ्या समाजकार्यात सहभाग घेत असल्याचे अभिमान होणार आहे हे नक्की!

Thursday 22 July, 2010

राजू (सुपारी) परुळेकर, तुमच्या गळ्यात चपलांचा हार का घालावासा वाटतो?

पत्रकारिता लेखन म्हणजे एक जबाबदारीचे काम! एका लेखाने अनेक मने जिंकता येतात, तर अनेकांची मने दुखवता येतात. विजय तेंडूलकरांना आपले गुरु मानणारे एक आजच्या काळातील लेखक आहेत राजू (सुपारी) परुळेकर.

अनेक राजकारण्यांवर आपण लेख लिहिता. अनेक म्हणण्यापेक्षा आपले जे मित्र असतात किंवा असे म्हणा ज्यांच्या भाकरीवर आपण जगता अशांवरच म्हटले तरी हरकत नाही. ज्याचे खाता त्याचे भरभरुन कौतुक करता हे मान्य आहेच. चला तुमची ही ’लाईफ स्टाईल’च आहे ना. असो!

एकेकाळी आपण मातोश्री (होय बाळासाहेबांचे निवासस्थान) च्या पायरीवर बसत होतात, आपल्याला आठवत असेलच! होय आठवायलाच पाहिजे विसरुन कसे चालेल? कारण आताही आपण ठाकरेंच्याच पायरीवर बसलेला असता पण ते ’मातोश्री’चे नसून आता ’कृष्णकुंज’चे आहेत. हे सगळे आठवायचे आणि आपले कोडकौतुक करण्याचे कारण हेच की सध्या आपण लोकप्रभाच्या अल्केमिस्ट्री मध्ये लिखाण करता म्हणून!

Friday 18 June, 2010

दहावी निकाल मदत केंद्राला भरघोस प्रतिसाद


यंदा दहावीचा निकाल इंटरनेटवरुन जाहिर होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होणार हे स्पष्टच होते. शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे आजच्या अनुभवावरुन लक्षात आले. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांच्या सुत्रानुसार आणि वरील होणारी गैरसोय पाहता हे मदत केंद्र सुरु करण्याचे ठरले  आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रचंड गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या माध्यमातून करता आल्याने खुपच समाधान वाटले.

बारावीप्रमाणेच दहावीचा निकाल सुद्धा प्रथम इंटरनेटवरुन जाहिर करून त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष निकालाची प्रत मिळणार असल्याचे बोर्डाने जाहिर केले. यामुळे सर्वात जास्त गैरसोय राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार होती. हे निकाल शासनाच्या महसुल विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात पाहण्याची सोय शासनाने केली होती. परंतु एका वृत्तपत्रात कोकणाची आकडेवारी आली होती ती अशी, कोकणातील चार जिल्ह्यांत एकूण १३८० तलाठी व ४७ तहसिलदार असून त्यांच्या कार्यालयात इंटरनेट सुविधाच नाही. नव्हे कोकणातील या चार जिल्ह्यात अजून इंटरनेटची सोयच नाही. तर मग शासनवरील आदेश काढून काय करणार होते?

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा आजच्या संपूर्ण दिवसात एकूण ३०८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातूनच फोन करत होते. निकाल केवळ एका फोन कॉलवर मिळत असल्यामुळे अनेक जणांनी शिवसेनेचे आभार सुद्धा मानले आणि भविष्यात असेच काम करत राहाल अशी इच्छाही व्यक्त केली. 

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेने सर्वात प्रथम बारावीसाठी असेच मदत केंद्र सुरु केले आणि आता दहावीसाठी! भविष्यात सुद्धा शिव माहिती व तंत्रज्ञान सेना अशा प्रकारच्या कामात नक्कीच पुढाकार घेईल. आजच्या या कामात शिवसेना ऑर्कुट समुदायावरील प्रत्यक्ष सहभागी आणि अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या शिवसैनिकांचा हातभार लागला तो खुपच मोलाचा होता. अशा सर्व शिवसैनिकांचे आभार!

Saturday 12 June, 2010

राज ठाकरे यांनी केले स्वत:चेच वस्त्रहरण!

परवाच्या विधानपरिषद निवडणूकांमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादीला मदत (पैसे घेतले पण आपण तिला मदतच म्हणू यात) करून टिकेचे धनी ठरलेले मनसे (धनसे)प्रमुख आज अक्षरश: बिथरुन गेले. कालच्या ईसकाळच्या अंकातील मराठी माणसांच्या काही प्रतिक्रिया सामना मध्ये आल्याने राज ठाकरे यांचा पारा चढला आणि आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. अक्षरश: बावचलेल्या अवस्थेत आजची त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यात काय बोलले तर मागच्या वेळचीच टेप पुन्हा वाजवली. यात नविन असे काहिच नव्हते. 

शिवसेनेने अमराठी लोकांना खासदार करण्यापासून ते मराठी भारतकुमार राऊत आणि निलम गोऱ्हेपर्यंत घसरले. मुळात आज त्यांची गाडी रुळावरून चालतच नव्हती. पत्रकारांनी टाकलेल्या बाऊंसर वर अक्षरश: लोटांगण घातले. तेच तेच रटाळ बोलताना काही खऱ्या गोष्टीसुद्धा सांगितल्या. माझे आमदार विधानसभेत आले पाहिजेत म्हणुन कॉंग्रेसला मदत केल्याचे सुद्धा सांगितले. तसेच महानगरपालिकेत सपा शिवसेनेला मदत कशी करते हे सुद्धा सांगायला विसरले नाही.

मुळात यांचे आमदार निलंबीत झालेच का? सर्व मराठी माणसांना माहिती आहे. त्याचा बराचसा गाजावाजा खुद्द राज ठाकरे यांनीच केला आहे. मराठी अस्मितेसाठी माझे आमदार हौतात्म्य सुद्धा पत्करायला तयार आहेत, मग परवा काय तुमच्या या आमदारांच्या मांजरी झाल्या का? लोकांच्या कामांची इतकी काळजी तुम्हाला त्यावेळी होती का? ज्या मराठी माणसांनी तुमच्या आमदारांना निवडून दिले त्या मराठी माणसांच्या मताची जाणिव तेव्हा नाही झाली? मुळात आता तर ते प्रकरण सुद्धा बनाव वाटायला लागले आहे. तु मारल्यासारखा कर मी लागल्यासारखा करतो. हिच तुमची भूमिका. मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड प्रसिद्धी कमवायची आणि 
मराठी माणसालाच फाट्यावर मारायचे हे तुमचे उद्योग काही नविन नाहीत.

परवाच्या विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेचा एक आमदार हरला याचे दु:ख नक्कीच आहे. एक आमदार शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा होता. पण ते होऊ शकले नाही. यासाठी तुमचा मनसे पक्ष जबाबदार आहे असे  मुळीच म्हणणे नाही. तुमचा स्वत:चा पक्ष आहे काय निर्णय घ्यायचे याचाही तुम्हाला अधिकार आहे. पण प्रत्येल वेळेस जे तुम्ही म्हणायचात की या सगळ्या युती-आघाड्यांसारखे मला राजकारण करायचे नाही. माझा पक्ष यांच्यापेक्षा वेगळा आहे. आता तुमचे काय म्हणणे आहे? ते तुम्ही लोकांना सांगितलातच नाहीत. खरेतर आजच्या पत्रकार परिषद हि तुमच्या शिवसेना काविळीचे एक उदाहरणच आहे. शिवसेनेला पराभव पचवता येत नसेलही पण ज्या मराठी मातीशी कॉंग्रेस सतत बेईमानाने वागते त्यांच्या कळपात जाऊन तुम्ही काय मोठे काम केलेत हो?

विधानपरिषदेत यापूर्वी अनेक मोठे लोक बिनविरोध निवडून जायचे. लेखक, कवी, गायक आणि इतर वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोक याच सभागृहाचे आमदार झालेले आहेत. पण आजच्या खाव सुटलेल्या जमान्यात ते चित्र दिसणे केवळ अशक्य आहे. पैशाच्या थैली समोर टाकल्या की राजकारणात सगळे काही मिळते. अशा प्रकारच्या निवडणूकीत घोडेबाजार (की गाढव) होतो हे सगळ्यांना माहित आहे. तरीही राज ठाकरे म्हणत आहेत की केवळ चार आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी आम्हि आघाडीला मतदान केले. पण परवाच तुमचे गटनेते टीव्ही वर हेच सांगायला का कचरत होते? 

राज ठाकरे आज तुम्हीच जगासमोर उघडे झाला आहात! सर्वजण असेच समजत होते की तुम्ही काहितरी वेगळे करत आहात? अर्थात ती गैरसमज दुर तुम्हीच आज केलात ते बरे झाले. शिवसेनेवर टिका केल्यामुळे तुमचा पक्ष एवढा मोठा होऊ शकते म्हणजेच शिवसेनेला किती महत्व आहे तेच बघा. तुम्ही स्वत: आज ज्या उड्या मारत आहात त्या सुद्धा शिवसेनेमुळेच! आज उद्धवसाहेबांनी सांगितलेच आहे जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा!

Wednesday 14 April, 2010

शिवसेना इंटरनेट समुदायाचा मेळावा!

मित्रानो आपण सर्वाना माहीतच असेल कि आपल्या समुदायाचा पहिला मेळावा शिवसेना भवन येथे पार पडला. मेळाव्याला लाभलेला प्रतिसाद फार उत्तम आणि अवर्णनीय होता. काल पर्यंत आपण शिवसेना ऑर्कुट समुदाय ह्या नावाने ओळखलो जात होतो परंतु कालच शिवसेना सचिव विनायक राउत साहेब यांनी सर्व सभासदांना सांगितले कि
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या समुदायाला या पुढे संघटनेचे रूप देण्याचे ठरवले असून
मा. बाळासाहेबानीच आपल्या या समुदायाच्या नवीन संघटनेला " शिव माहिती तंत्रज्ञान सेना " हे नाव दिले आहे..
मित्रानो पक्षाने आपल्यावर फार मोठी जवाबदारी दिली आहे. आजपासूनच सर्व कामाला लागू या आणि शिवसेना या पक्षाच्या वाढीसाठी हातभार लावूया ..

सदर मेळाव्यासाठी शिवसेना सचिव विनायक राउत साहेब, विद्यार्थी सेनेचें अध्यक्ष अभिजित पानसे, राहुलजी खेडेकर, मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे साहेब , अमेरिकेहून खास ह्या मेळाव्याकरिता उपस्थित असेलेले सुनीलजी मंत्री आदी उपस्थित होते..

मेळाव्याची प्रस्तावना आपले समुदाय नियंत्रक अमित चिविलकर यांनी केली. आपल्या समुदायातील अक्षया महाडिक, मेघाताई गावडे, सतीश पानपत्ते, अमोल नाईक यांनी आपले विचार मांडले.
समुद्याची वाटचाल कशी असेल या बाबत श्री. जनार्दन मानकर साहेब यांनी उपस्थितांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या समुदायातील सभासद विशेष राणे यांनी केले.

भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे यांही समुदाय्च्या वाटचाली बाबत समाधान व्यक्त करत यापुढे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे साहेब यांनी सुद्धा समुदायाला गरज लागेल तेव्हा मदतीला उभा असें असे आश्वासन दिले. शिवसेना सचिव विनायक राउत साहेब यांनी आपल्या समुदायाच्या कार्यातून शिवसेना द्वेष्ट्यांचे दात घश्यात घालण्याचे आव्हान केले व त्यांनी समुदायाचे कोडकौतुक हि केले.

Monday 12 April, 2010

ऐतिहासिक क्षणाला काहीच तास उरले!

आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षणाला काहीच तास आता उरले आहेत.. कारण उद्या दुपारी ४ वाजता शिवसेना भवन येथे आपल्या समुदायाचा मेळावा पार पडणार आहे.

२१ व्या युगात इंटरनेट हे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत असताना फक्त आणि फक्त शिवसेना या पक्षाने त्याचे महत्व जाणून इंटरनेट वर कार्यरत असणाऱ्या युवकांना एकत्र करून पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं. इंटरनेट वर काम करणारी मुलंच उद्या समाजोन्नती साठी भरीव कार्य करू शकतात हे शिवसेना कार्यप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेबांनी जाणलं आणि अश्या युवकांना एकत्र आणण्याच काम आपल्या समुदायावर सोपवलं. आणि इंटरनेट हेच येत्या काही काळात प्रभावी माध्यम असेल हि दूरदृष्टी फक्त आणि फक्त उद्धाव्साहेबंकडेच आहे हे मला सांगायला अभिमान वाटत आहे. एका पक्षाचा प्रमुख उद्या मेळाव्यामध्ये तुम्हा आम्हा सामान्य शिवसैनिकाना मार्गदर्शन करणार आहे.

इंटरनेट वर बसलेली मुल फक्त वेळ घालवण्यासाठी त्याचा उपयोग करतात, चाटिंग, मित्रमैत्रिणी वाढवण्यासाठी इंटरनेटचा आजपर्यंत वापर होत होता परंतु शिवसेना या पक्षाने त्याचप्रमाणे उद्धवसाहेबांनी दाखवून दिल कि ह्याच मुलांना योग्य दिशा दाखवली तर हीच मुल एक पक्ष वाढवण्याच काम देखील करू शकतात, तरुणांच्या मूळ भावना उद्धवसाहेबांनी जाणून घेतल्या. मित्रानो उद्या मेळाव्याला येताना विचार करा कि काल पर्यंत आपण कोण होतो ? परंतु फक्त उद्धवसाहेबांन मुळेच उद्यापासून आपण एका पक्षाच्या मुख्य प्रवाहात असणार आहोत.

मित्रानो उद्यापासून आपली जवाबदारी वाढणार आहे कारण उद्यापासून आपण शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेबांचे ज्वलंत विचारांचा इंटरनेट च्या माध्यमातून सर्वत्र प्रचार करणार आहोत.

उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला आता पात्र होण्याची वेळ आली आहे. आपण सर्व निर्धार करूया आणि उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ करूया.

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!

अमोल नाईक

Saturday 20 March, 2010

‘खान’चे असली उद्योग - सामना अग्रलेख

कॉंग्रेस पक्षाचा लाडका शाहरुख खान याचा ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा पडद्यावर कोसळला असला तरी त्या सिनेमाचा हेतू सफल झाला आहे. ‘माय नेम इज खान’ला लोकांनी केव्हाच सिनेमागृहातून खाली उतरवले. पडद्यावर दगडधोंडे मारून खान व त्या करण जोहरची छी: थू: केली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात व देशातही खानाचा ‘गल्ला’ भरला नाही. हा सिनेमा अरब व इस्लामी राष्ट्रांत मात्र भरपूर गाजला. पाकिस्तानात तर शाहरुख खानचा नुसता ‘जय हो’च झाला. पण त्याहीपेक्षा जी एक वेगळी माहिती आता या खानच्या बाबतीत बाहेर आली आहे ती डोके सुन्न करणारी आहे. ‘माय नेम इज खान’ चित्रपट मुसलमान तरुणांना दाखवून त्यांची डोकी भडकवायची व त्यांच्याकडून अतिरेकी कारवाया घडवून आणायच्या अशा प्रकारची योजना धर्मांध मुस्लिमांनी आखल्याचे उघड झाले आहे. हिजबुल, अल-कायदा वगैरे अतिरेकी संघटनांनी याबाबत आखलेली कट-कारस्थाने म्हणजे आणखी एका नव्या ‘जिहाद’ची तयारीच म्हणायला हवी.

अहमदाबादमधील दहशतवादविरोधी पथकाने यासंदर्भात अटक केलेल्या अतिरेक्यांनीच हा गौप्यस्फोट केला. गुजरातमधील काही सिनेमागृहांत अद्यापि ‘माय नेम इज खान’च्या पाट्या झळकत आहेत. या चित्रपटाची असंख्य तिकिटे पकडलेल्या अतिरेक्यांकडे सापडली. ही तिकिटे कशासाठी, असा ‘थर्ड डिग्री’ प्रश्‍न विचारताच पाकनिष्ठ पोपट धडाधडा बोलू लागले, ‘मुस्लिम तरुणांनी हा सिनेमा जास्तीत जास्त पाहावा व त्यांनी हिंदुस्थानविरुद्ध जिहाद पुकारावा. हिंदूंच्या
कत्तली कराव्यात यासाठीच या

सिनेमाचा वापर हिंदुस्थानविरोधी इस्लामी संघटना
करीत आहेत’, असे या पोपटांनी सांगितले. ‘माय नेम इज खान’मध्ये मुस्लिमांची कशी ससेहोलपट होते, ते मुसलमान असल्याने त्यांना अनेक देशांत कसा त्रास होतो, अपमानास्पद वागणुकीचा अनुभव येतो अशा प्रकारचे कथानक असल्याचे सांगितले जाते. खरे-खोटे त्या खानास व त्याच्या कॉंग्रेजी पिलावळीलाच माहीत. आम्ही एरवी काही चांगले चित्रपट अधूनमधून पाहत असतो, पण पाकपे्रमाची उबळ आलेल्या खानाचा हा चित्रपट काही आम्ही पाहिला नाही. त्यामुळे त्या चित्रपटात काय आहे? तो कसा आहे? तो खान आहे की घाण आहे? याबाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही. मात्र चित्रपट कोसळला असला तरी ‘हिजबूल’ वगैरे हिंदुस्थानविरोधी संघटनांना तो खूपच आवडल्याचे त्यांच्या एकंदरीत कारवायांवरून दिसून येत आहे. मुसलमान तरुणांना भडकविण्यासाठी या चित्रपटाचा वापर सुरू आहे. याबाबत त्या करण जोहरला व खानास आता काय म्हणायचे आहे? हिंदूंचा कोथळा काढण्यासाठी मुसलमान तरुणांची डोकी तयार व्हावीत हाच या चित्रपटाचा मुख्य हेतू होता. अहमदाबादमध्ये पकडलेल्या संशयित आरोपीच्या जबानीतून तरी आम्हाला तेच दिसत आहे. मुसलमानांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे आणि त्यांचे हाल होत आहेत असे कथानक कोणी दाखवत असेल व त्यावरून हिंदुस्थानातील मुसलमान तरुणांना कोणी भडकवीत असेल तर त्याबाबत सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. खरंतर अशा प्रकारची कथानके निर्माण करून मुसलमानांना भडकविण्याचे उद्योग कुणी या देशात तरी करू नयेत. येथील मुसलमानांचा कोणीही अपमान करीत नाही व त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत नाही. या देशाचे नाव भले ‘हिंदुस्थान’ असेल, पण येथे फक्त मुसलमानांचीच चलती आहे. पाकिस्तानात मुसलमानांचे जेवढे लाडकोड होत नसतील त्यापेक्षा जास्त संरक्षण आणि दौलतजादा येथील मुसलमानांवर होत आहे. देशद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या अफझल गुरूलाही कॉंग्रेसवाल्यांनी जीवनदान दिले ते फक्त मुसलमान असल्यामुळेच.  पाक क्रिकेटपटूंसाठी पायघड्या घालणार्‍या शाहरुख खानलाही आमच्या राज्यकर्त्यांनी

22 हजार पोलिसांचे संरक्षण
दिलेच ना? तुमच्या गळ्याभोवतीचा फास सोडवण्याची हिंमत फक्त हिंदुस्थानातच दाखवली जाऊ शकते. कारण शेवटी तुम्ही मुसलमान आहात ना? या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार फक्त मुसलमानांचाच राहील अशी घोषणा ज्या देशाचे पंतप्रधान करतात त्या देशात मुसलमानांचा अपमान होतो असे कोणत्या तोंडाने सांगता? ‘माय नेम इज खान’साठी व खासकरून त्या पाकड्या क्रिकेटपटूंसाठी अशोक चव्हाण हे शाहरुख खानचे बॉडीगार्डच बनले होते. काय त्याचे विमानतळावर स्वागत, काय त्याच्या बंगल्यास पोलिसांचा गराडा, काय त्याचा टीव्ही चॅनलवर उदोउदो! जणू हे कोणी राष्ट्रनिष्ठ क्रांतिकारकच निर्माण झाले हो! मुसलमान म्हणून तुम्हाला जे आज हिंदुस्थानात मिळत आहे ते पाकिस्तानात जन्माला आला असता तर मिळाले असते काय? पाकिस्तानातील उरल्यासुरल्या हिंदूंसाठी तेथील राज्यकर्त्यांनी एखादा ‘सच्चर’ आयोग नेमून शे-पाचशे कोटींची बरसात केली असेल तर सांगावे. कश्मीर खोर्‍यात हिंदूंच्या कत्तली झाल्या, कश्मिरी पंडितांना घरेदारे सोडून पळावे लागले. शेकडो देवळांचा विध्वंस झाला याचे चित्रीकरण करून दाखवायचे म्हटले तर ‘हिंदूंना’ चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आमच्यावर खटले दाखल करतील. मग ज्या ‘खान’ चित्रपटावरून मुसलमानांची डोकी भडकविण्याचे उद्योग चालले आहेत त्याबाबत शाहरुख खानचे बॉडीगार्ड बनलेले अशोक चव्हाण, तिकडे नरेंद्र मोदी कोणती कारवाई करणार? की खान व त्याच्या पिलावळीला आणखी बळ देणार? महाराष्ट्र सरकारकडून अशा कारवाईची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. आता नरेंद्र मोदींनीच काही करावे.

Sunday 14 March, 2010

विंदांना भावपूर्ण आदरांजली..


गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन २००३ साली गौरवण्यात आले होते. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक ठरले. त्याशिवाय कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार तसेच विद्यापीठांच्या डी.लिटस् अशा पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

विंदांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवण गावी झाली. विंदाचे वडिल 'विनायक करंदीकर' कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. संघ ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास राहीला. पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाही. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजिक कार्यात सक्रीय असतात. तसेच त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

विंदांचे समग्र वाङ्मय

विंदानी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या रंजक, वैचारीक, काव्यलेखनाने भर घातली. मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामान्यापर्यंत पोहचेल असे पाहीले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांचे कडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषेस परिचय झाला. हा त्यांचा साहित्यिक प्रवास त्यांनी इ.स. १९८१ साली लेखन निवृत्ती घेउन यशस्वीपणे पूर्ण केला.

स्वेदगंगा (इ.स. १९४९), मृद्गंध (इ.स. १९५४), धृपद (इ.स. १९५९), जातक (इ.स. १९६८), विरूपिका (इ.स. १९८१), अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार) असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह गाजले. त्याशिवाय संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर), आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष) या संकलित काव्यसंग्रहासाठीही त्यांनी योगदान दिले. विंदांच्या बालकविता खूपच गाजल्या. राणीची बाग (इ.स. १९६१), एकदा काय झाले (इ.स. १९६१), सशाचे कान (इ.स. १९६३), एटू लोकांचा देश (इ.स. १९६३), परी ग परी (इ.स. १९६५), अजबखाना (इ.स. १९७४), सर्कसवाला (इ.स. १९७५), पिशीमावशी आणि तिची भुतावळ (इ.स. १९८१), अडम् तडम् (इ.स. १९८५), टॉप (इ.स. १९९३), सात एके सात (इ.स. १९९३), बागुलबोवा (इ.स. १९९३) अशा बालसाहित्यातून त्यांनी मुलांचे मनोरंजन केले.

धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स


Friday 5 March, 2010

’भारत श्री’चा पगार कमी; अमेरिकेने विसा नाकारला!!


महाराष्ट्रातील मुले मेहनती नाहीत, त्यांना मेहनत करायचे माहित नाही. म्हणून परप्रांतिय इकडे येऊन आपल्या नोकऱ्या बळकावतात.

सुहास खामकर बॉडी बिल्डींग मध्ये सलग चार वेळा ’भारत श्री’ पटकावणाऱ्या आणि ’शिव छत्रपती पुरस्कार’ विजेत्या खेळाडूचे काय?

सुहास खामकर रेल्वे मध्ये टी.सी. म्हणून काम करतो. दरमहा रू. १२०००/- पगार मिळतो. टी.सी. ना दिवस आणी रात्रपाळी असे काम करावे लागते, तरीही बॉडी बिल्डींग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे, हिंदुस्थान आणि महाराष्ट्राचे नाव मोठं करायचं, हिच त्याची धडपड रात्रंदिवस सुरू असते.

शेवटी ती वेळही आली, अमेरिकेत ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धा (कोलंबस, ओहियो) मध्ये भाग घ्यायचा होता. पण अमेरिकन दुतावासाने या आठवड्यात दोन वेळा त्याचा विसा नाकारला. का? कारण पगार कमी आहे...

सुहासने सरळ मुख्यमंत्री कार्यालयात धाव घेतली, पण मुख्यमंत्र्यांनीही त्याला भेट देण्याचे नाकारले. तसेच कोंबडीचोर नारोबाकडेही त्याने धाव घेतली पण त्या नारोबाकडेही सुहाससाठी वेळ नव्हती.

कसले हे भिकार सरकार? कुठे आहेत आपले महाराष्ट्राचे आणि देशाचे क्रिडामंत्री? सुहाससारख्या जीवतोड मेहनत घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात नसेल तर आणखी कोणाला हे देणार आहेत?

सुहास खामकरला ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आलेले निमंत्रण :


सुहास आता येत्या जुन मध्ये होणाऱ्या आशियाई बॉडी बिल्डींग स्पर्धेची तयारी करतोय. प्रायोजक नसल्याने त्याच्या तुटपुंज्या पगारातून त्याला स्वत:चे पैसे खर्च करावे लागत आहेत. सरकार मदत देवो वा न देवो महाराष्ट्रातील सर्व तरूणांनी सुहासच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या परीने सुहासला मदत करू या.

आपण सुहासला थेट त्याच्या मोबाईल वर संपर्क करू शकता किंवा ईमेल द्वारे त्याला कळवू शकता

सुहासचा मोबाईल नंबर आहे +९१-९८९२६८४९२१

ईमेल आहे : suhas.khamkar@yahoo.com

Wednesday 3 March, 2010

शिवरायांचा सरकारला विसर!


आज फाल्गुन कृ. तृतिया म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८० वी जयंती.

शिवाजी महाराजांची कीर्ति संपूर्ण जगाला माहिती आहे. तसा त्या वेळेचा उल्लेख इंग्रजांनी त्यांच्या वर्तमान पत्रात दिल्याचे काही महिन्यांपूर्वी स्पष्ट झाले. पण इथे आपले केंद्रसरकार अजून झोपा काढत आहे.

www.india.gov.in हि केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. याचे सर्व काम नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) बघते. या संकेतस्थळावर हिंदुस्थानातील सर्व प्रकारची माहिती तसेच इतिहास दिलेला आहे. तसेच हिंदुस्थानात किती राजे होते त्याबद्दलची माहिती स्पष्टपणे दिलेली आहे.

याच संकेतस्थळावर मध्यकालीन इतिहास मध्ये बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेब यांची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अफजलखानाचा कोथळा काढला, त्यांचा इथे एकाही ओळीमध्ये उल्लेख केलेला नाही.

शिवछत्रपतींच्या आजच्या जयंती निमित्त आपण आपल्या सर्व मित्रांना ई-मेल, एसेमेस करतो, फोटोज पाठवून महाराजांची आठवण काढतो, हे सगळं केल्यानी शिवजयंतीची आठवण नक्कीच जागवतो पण ज्या हिंदुस्थानात आपण राहतो त्याच हिंदुस्थानच्या केंद्र सरकारला याची जाग येण्यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत. नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) ला त्यांचे ईमेल indiaportal@gov.in आणि siomsu@hub.inc.in वर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास लवकरात लवकर संकेतस्थळावर दिसले पाहिजे अशी विनंती करा.

नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) चे संपर्क कार्यालयाचे पत्ते पुढीलप्रमाणे :

मुख्य कार्यालय दिल्ली : इंडीया पोर्टल सेक्रेटरी, तिसरा माळा, नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर, ’ए’ ब्लॉक, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली - ११०००३,

मुंबई कार्यालय : NIC स्टेट सेंटर, ११ वा मजला, नविन प्रशासकिय बिल्डींग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

सुनिल मंत्री,
बॉस्टन, युनाइटेड स्टेट्स.

Sunday 21 February, 2010

दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!


शिवसेना नेते श्री. मधुकर (दादा) सरपोतदार यांचे काल संध्याकाळी हिंदुजा इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. दादा हे बाळासाहेबांच्या ’अष्टप्रधान मंडळा’तील एक नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून आजन्म शिवसेनेत राहिलेले दादांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आंजणारी गावात ३१ जानेवारी १९३४ साली झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जॉन्सन कंपनीमध्ये पसोर्नेल मॅनेजर या पदावर रूजू झाले. याच काळात त्यांनी अनेक शिवसैनिकांना नोकरला लावले. यातील अनेक पुढे शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवक झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या सरपोतदारांचे वक्तृत्वही उत्तम होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या सरपोतदार यांनी पक्षाच्या कामात झोकून दिले. कामगारांविषयी तळमळ असलेल्या सरपोतदारांनी महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या मागण्यांसाठी दत्ताजी साळवी यांची भारतीय कामगार सेना एकीकडे रस्त्यावर उतरायची तर, कॉपोर्रेट क्षेत्रात उत्तम संबंध असलेले आणि फडेर् इंग्रजी बोलणारे सरपोतदार कंपन्यांच्या मालकांशी भांडून कामगारांना न्याय मिळवून देत.

आजन्म शिवसेनेत कार्यरत असलेले दादांच्या या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!

Wednesday 17 February, 2010

आता तपास सुरू झालाय.. पण फायदा काय?

शनिवारी हादरलेले पुणे अजुन पर्यंत सावरलेले नाही. लोकांमध्ये दहशत आहे. अशी वाक्य सध्या मिडीयामध्ये सुरू आहे. रोज नविन नविन रिपोर्ट्स बनत आहेत, दाखविले जात आहेत. पोलिस धागे-दोरे-सुया शोधत आहेत. प्रत्येक आतंकवादी हल्ल्यानंतर हेच होते.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशावर सर्वात मोठा आतंकवादी हल्ला झाला. पहिल्यांदाच एका आतंकवाद्याला आमच्या शहिद तुकाराम ओंबळेंनी पकडून दिले. आतंकवादी कसाबचा जिवंत चेहरा जगाने प्रथमच पाहिला. वरीलप्रमाणे सगळ्या गोष्टी इथेही घडल्या. पोलिसांना सगळे धागे-दोरे-सुया मिळाले. एवढेच नाही तर आता जवळ सव्वा वर्षे होत आली, कसाब मराठीही बोलायला लागला. पण आपल्या सरकारने काय वाकडे केले कसाबचे? कोर्टात खटला सुरू आहे. एका वर्षाच्या आत कसाबला शिक्षा होईल असे सगळेजण बोलत होते पण काय झाले का हो?

आतंकवादी सापडला आणि आपण त्याला शिक्षा देत नाही. अफजलगुरू घरच्यापेक्षा सुखाने तुरूंगात जगत आहे. कसाबने बाप जन्मी कधी सुख भोगले नसेल इतके आता भोगत आहे. आम्ही आपले अजुन धागे-दोरे-सुया शोधतोय. काय मुर्खपणा आहे हा?

पुणे हल्ल्याचा शोध सुरू झालाय. सरकारी पैसा यासाठी वापरला जाईल. पण याने काही फायदा होणार आहे का? आतंकवादी पळाले आणि आपण आपले आता शोधाशोध सुरू करतोय. ’माय नेम इज खान’ साठी २२००० पोलिस तैनात केले. कुणी विचार केला का की इतका फौजफाटा आपण कुणाला देतोय आणि का? लोकांच्या करोडो रुपयांच्या कर स्वरूपात आलेल्या रकमेची अशी उधळपट्टी फक्त खानावरच का? सर्व सामान्यांनी असे घाबरत आयुष्य जगायचे का?

आतंकवाद्यांना सजा झालीच पाहिजे. पण अफजल गुरू, कसाब यांना शिक्षा देऊन आपण आतंकवाद्यांना का दाखवून देत नाही की हिंदुस्थानवर हल्ला केलात तर कशी सजा मिळते. आज बाळासाहेबांनी सांगितले तेच बरोबर. कुणीही या इकडे आणि धिंगाणा घाला. कोण काहीही बोलणार नाही.

Sunday 14 February, 2010

पुन्हा एकदा आतंकवादी हल्ला, जनतेचे रक्षण कोण करणार?


काल पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले. आपल्याच महाराष्ट्रातील पुण्यामध्ये हे स्फोट झाले आणि त्यात १० पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले आणि जवळ जवळ ५० च्या आसपास लोक जखमी झालेत. मिडियामध्येही ही बातमी ’ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखविली जात होती. पण याची आता सर्व देशवासियांना सवय झालेली आहे. हे काही हिंदुस्थानींसाठी नविन नाही. देशातील अनेक शहरांना असे अनेक हादरे बसले आहेत.

आपल्या देशात सरकार नावाचे बुजगावणे जे आहे ते मुळात सर्वसामान्यांसाठी नसून ते फक्त वाचाळ बडबड करणाऱ्या शाहरूख खान आणि पळपुट्या राहुलसाठी.

मागिल सात दिवस जे मुंबईने पाहिले त्याने प्रत्येक मुंबईकरांना धक्काच बसला आहे. शिवसेनाप्रमुखांनी केवळ राहुल गांधीला काळे झेंडे दाखवा सांगितले आणि मुख्यमंत्री आणि गृहविभाग जणू देशातील जनतेवर आतंकवादी हल्ला होणार असल्यासारखे पोलिसांचे मुंबईभर कडे उभे केले. त्यात अनेक शिवसैनिकांना अटका झाल्या, कुणाला मार खावे लागले, कुणावर बंदुका रोखल्या गेल्या.

मागचे चार दिवस तर मुख्यमंत्र्याने जो प्रकार केला त्याचा प्रत्येक नागरीकाने धिक्कार केला पाहिजे असाच होता. ज्या शाहरूख खानने पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच आपले पुर्वज पाकिस्तानी असल्याचे अभिमानाने सांगितले त्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अक्षरश: जीव ओवाळून टाकायला तयार होते. हजारो शिवसैनिकांना अटक करून चित्रपट रिलीज करून मोठा विजय मिळवल्याच्या अविर्भावात वागत होते.

पण एवढे सगळे जर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी यांनी केले असते तर जे काल १० लोक मारली गेली त्यांचे प्राण वाचले नसते का? जो गृहराज्यमंत्री राहुल गांधीच्या सुरक्षिततेसाठी त्याचे जोडे उचलण्याचे काम करतो त्याने त्याच्या मतदारसंघातील लोकांचे प्राण वाचावे यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको? कॉंग्रेसवाले नको तिथे नको ते चाळे करतात आणि अशा आतंकवादी हल्ल्यात सर्वसामान्यांना मरण ओढवावे लागते.

मागे प्रज्ञा साध्वीच्या मागे करकरेंसहित सर्व पोलिसी बळ लावले आणि मुंबई आतंकवाद्यांसाठी आंदण देऊन टाकली. पुढे जे काही घडले तो आज इतिहास आहे. कसाबला एका वर्षाच्या आत सजा दिली जाईल असे म्हणणारे शासन अजूनही त्याचे लाड करण्यात मश्गुल आहे.

हे असेच होत राहणार अफजल गुरू, कसाब सारख्या आतंकवाद्यांचे असे लाड सुरूच राहतील कारण मारला जाणारा हा गांधी नसतो. म्हणून आता देशातील लोकांनीच प्रार्थना करावी प्रत्येकाला गांधी कुटूंबात जन्माला घाल म्हणजे कुणालाही आतंकवादी हल्ल्यात मरण येणार नाही.

Saturday 13 February, 2010

शाब्बास शिवसैनिकानो! आम्हाला तुमचा अभिमान आहे!


साहेबांच्या एका आदेशाने प्राणाची बाजी लावणाऱ्या शिवसैनिकांनी काल परत आपल्या प्राणाची पर्वा न करता ’माय नेम इज खान’ चा विरोध केला. त्या सर्व शिवसैनिकांना संपूर्ण हिंदुस्थान लाख लाख सलाम करतोय.

अशोक खान-चव्हाणने अपयश हाती येतेय हे पाहून मल्टीप्लेक्स मालकांवर दबाव आणून चित्रपट रिलीज करायला लावला. जे चित्रपट बघायला गेले ते नक्कीच देशप्रेमी नसून ’खान’प्रेमी आहेत यात शंका नाही.

ज्या रितीने हे लोक चित्रपट बघायला गेले, तसेच हे लोक मंत्रालयावर मोर्चा नेऊन सरकारला कसाबला फाशी कधी देणार हे का विचारत नाही? जे लोक हा चित्रपट बघायला जात आहेत, ते नक्कीच हिंदुस्थानसाठी बलिदान करणाऱ्या सैनिक आणि क्रांतीकारकांची खिल्ली उडवत आहेत असेच म्हणावे लागेल.

चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये जरी दबावाने सुरू करण्यात आला असला तरी इतर चित्रपटगृहामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी सुरू करू दिला नाही आणि मराठी माणसाने याला प्रतिसाद दिलेला आहे.

शाहरूख खानला बॉलीवुडनेही भिक घातली नाही, काही खानप्रेमी सेलिब्रिटींना वगळता बाकी संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीने हा चित्रपट न बघून खानावर बहिष्कार टाकला.

शिवसैनिकांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही, याचा हिशेब अशोक खान-चव्हाण आणि कॉंग्रेस कडून घेतला जाईल.

कॉंग्रेस सरकार सत्तेत येऊन अजून फक्त चारच महिनेही पूर्ण झालेले नाहीत आणि शिवसैनिकांनी त्यांना पुरते अस्वस्थ करून टाकलेय, राहुल गांधी मुंबईत येऊन पळवाटेने निघून जावे लागले याचा जाब अशोक खान चव्हाणला दिल्लीला नक्कीच विचारला जाणार आहे. आता शिवसैनिकांसाठी इतके बंदोबस्त करावे लागत पुढे शिवसैनिक आणि शिवसेना यांचे काय हाल करेल हे त्यांना समजणार आहेच!

सुनिल मंत्री
बोस्टन, अमेरीका