Thursday, 30 July 2009
Monday, 27 July 2009
उद्धवसाहेब - तरूणांचे आदर्श नेतृत्व
शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धवसाहेबांना नक्कीच "मातोश्री" मध्ये बसून शिवसैनिकांना आदेश देऊन काम करता आले असते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून शिवसेना वाढवण्याचे काम करत आहेत. शिवसैनिकांसह वेगवेगळ्या आंदोलनांत स्वत: सहभागी जनतेच्या कामांचा आवाज सरकारसमोर मांडत आहेत. शेतकरी आत्महत्यांविरोधात पुकारलेल्या जबरदस्त आंदोलनासमोर सरकारला झुकवून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली परंतु नालायक सरकारच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. शेतकरी आत्महत्या, देता की जाता, वीजभारनियमन, युएलसी आणि म्हाडा विरोधातील मोर्चा, रिलायन्स भाववाढीच्या विरोधातील आंदोलन अशा आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणमंत्र्यांनी घातलेल्या गोंधळाला सामंजस्याची भूमिका वारंवार सुचना देऊनही शेवटी व्हायचा तो गोंधळ झालाच.
उद्धवसाहेबांचे व्यक्तीमत्व प्रत्यक्ष भेटणाऱ्याला चांगले कळते असे मला वाटते. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे प्रश्न सच्चेपणाने आज फक्त उद्धवसाहेब मांडत आहेत. केवळ दगडफेक करून मराठी माणसांची मने भडकवणे सोप्पे आहे पण त्याच्या गरजांवर आवाज उठविणे सोप्पे नाही हे चित्रच सध्या आहे. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी, भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आज मराठी माणसांची नौका फक्त आणि फक्त उद्धवसाहेबच किनाऱ्याला लावू शकतात. शिवसेनेची सता असताना शिवसेनेने काय केलेले विचारणारे स्वत:च्या तुंबड्या भरून झाल्यावर हे प्रश्न निर्माण करीत आहेत. म्हणूनच एकदा उद्धवसाहेबांच्या हाती सत्ता आल्यास त्याची उत्तरे मिळतील किंबहुना सत्ता नसतानाही त्याची झळक मिळाली आहे.
आजच्या उद्धवसाहेबांच्या वाढदिवशी आपण सर्वांनी शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, एका सुसंस्कारीत, सुशिक्षित, आदर्श नेत्याकडे महाराष्ट्र सोपविण्यासाठी प्रत्येक तरूणांनी उद्धवसाहेबांचे मागे उभे राहावेच लागेल!
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
Monday, 22 June 2009
वांद्र्याची आग आणि बिल्डर
परवा वांद्रे येथील पूर्वेकडील बेहराम पाडा झोपडपट्टीत लागलेल्या आगीमागे आता बिल्डराचा हात असल्याचा लेख आजच्या सामनामध्ये आलेला आहे तो लेख आपण इथे क्लिक करून वाचू शकता.
नविन बांधलेल्या स्कायवॉकवरून प्रवास करताना सहज नजर उजव्या बाजूला टाकली तरी तिथे ५-६ मजली झोपड्या दिसायच्या. मुंबईतील इतर खासकरून हिंदूबहुल वस्त्यांमध्ये असे प्रकार नाहीतच किंवा १४ फुटापेक्षा जास्त उंची जात असल्यास पोलिस तिथे कारवाईला हजर असतात. आजही आपण वांद्रे पश्चिमेला स्टेशनच्या बाजूला नजर टाकल्यास ३-४ मजली झोपड्या दिसतील.
मतांवर डोळा ठेवून राज्यशासन वेगवेगळ्या योजना मुस्लिमांसाठी आणत असतानाच आजच्या सामनामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या झोपडपट्टीला तात्काळ एसआरए मध्ये कसे घेण्यात आलेय हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. बघू या काय काय घडतेय पुढे..!
Sunday, 21 June 2009
साहेब आता आयसीयू तून बाहेर!
शिवसेनाद्वेष्ट्यांनी दोन दिवस अफवांच्या घातलेल्या धुमाकुळीमुळे किंवा देव पाण्यात बुडवून ठेवलेल्यांसाठी हि खुपच धक्कादायक अशीच बातमी म्हणू शकतो. शिवसैनिकांना मानसिकरित्या त्रास देण्याचे काम या लोकांनी केलेले आहे. तेव्हा आता शिवसैनिक कसल्याही अफवांवर विश्वास ठेवूच शकणार नाही!
भवानी माते आमच्या साहेबांना लवकर पूर्णपणे बरे कर आणि शिवसेनेवरचे संकट दूर कर!
Friday, 19 June 2009
Tuesday, 2 June 2009
Wednesday, 20 May 2009
शिवसेनेचे शत्रु अनेक आहेत पण शिवसेनेचा शत्रु क्रमांक एक हा कॉंग्रेस आहे
या पत्रकार परिषदेत उद्धवसाहेब नेमके काय काय बोल्लेत हे पुढीलप्रमाणे...
उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये शिवसेनेने असे काय कमी केले कि मुंबईकरांनी कॉंग्रेसला साथ दिली...पण आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे. आगामी निवडणुकीत हा विश्वास फळाला येईल.
अपयशाने खचुन न जाता शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे असा संदेश उद्धवसाहेबांनी त्यांचा शिवसैनिकांना दिला.
ते पुढे म्हणाले कि कोणत्याही स्टार शिवाय आणि जनतेचे प्रश्न ह्या मुद्यांवर आम्ही निवडणुक लढवली.
उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि मागच्या लोकसभेच्या वेळी पक्षामध्ये अमर, अकबर, ऍंथनी सर्व होते...तेव्हा महाराष्ट्रामध्ये सेनेच्या १२ जागा आल्या... आता हे अमर,अकबर,ऍंथनी निघुन गेले तरी सेनेला ११ जागा मिळाल्या.मुंबईची एक सिट कमी झाली.अर्थात ह्यात काय आनंदाची गोष्ट पण नाही आहे. अशाप्रकारे उद्धवसाहेबांनी राज ला जोरदार टोळा लगावला.
ते पुढे म्हणाले कि रामटेक जागा आम्ही थोडक्यात हरलो... धाराशिव मध्ये ही तेच झाले.ग्रामिण भागात शिवसेनेने चांगली कमाई केली असं ते म्हणाले.
उद्धवसाहेब म्हणाले कि निकाल हे निकाल असतात... त्यांचं खापर कोणावर फोडणं हे योग्य नाही. विधानसभेवर भगवा फडकणारच असा जोरदार आत्मविश्वास उद्धवसाहेबांनी दाखवला.
ते पुढे म्हणाले मुंबईकरांनी कॉंग्रेसवर विश्वास दाखवला ह्याचं मला आश्चर्य़ वाटते. २६/११ च्या हल्ल्यात शिवसैनिक मदतकार्य करत होते,तरी मुंबई कॉंग्रेसला कशी भुलली? असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे शत्रु अनेक आहेत पण शिवसेनेचा शत्रु क्रमांक एक हा कॉंग्रेस आहे असे उद्धवसाहेब बोलले.
डोळ्यदेखत भगवा खाली उतरणं यासारखं दुसरं दु:ख ते कोणतं? मतविभागणी होऊ नये ह्याची काळजी आम्ही आगामी निवडणुकीत घेऊ असे उद्धवसाहेबांनी पत्रकारांना सांगीतले.
पुढे ते म्हणाले खासदार विजयी झाले ते माझ्या मुळे नाही तर शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनती मुळे झाले.
एका निवडणुकीवर दुसरया निवडणुकीचे निकाल अवलंबून नसतात असे ते म्हणाले.मागच्या लोकसभेत देखिल शिवसेनेचे फक्त मोहन रावले हे खासदार निवडुन आले.पण त्या नंतर विधानसभेवर अनेक सेनेचे आमदार निवडुन आले आणि महानगर पालिकेत पुन्हा सत्ता ही आली.
मनसेविषयी बोलताना उद्धवसाहेब म्हणाले...जी मराठी मतं विरोधकांच्या दिशेने गेली ती मतं परत येणार ह्याचा ठाम विश्वास आहे. पत्रकारांनी जेव्हा विचारले कि मनसेशी युती करणार का?...त्यावर उद्धवसाहेब म्हणाले कि शिवसेनाप्रमुखांनी त्यांचे मत सांगीतलेले आहे आणि त्यांचे प्रत्येक विचार,मतं आणि आदेश ह्याचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे.जे शिवसेनाप्रमुख सांगतील आम्ही तेच करणार.शिवसेना प्रमुखांनी ठाम मत दिलेलं आहे..आता मला नाही वाटत कि कोणाच्या मनात काही शंका उरली असणार.जिथे आम्ही कमी पडलो ति उणीव आम्ही भरुन काढु असे उद्धवसाहेब पुढे म्हणाले.
’हमने दो ही मारा..पर सॉलिड मारा’ ह्यावर जेव्हा पत्रकाराने उद्धवसाहेबांना प्रतिक्रिया दिली कि कोणाला मारतायेत त्याचा विचार करा...शिवसेनेने मराठी माणसासाठी आपल्या स्वार्थाचा विचार कधीच केला नाही किव्हा मराठी माणसाचा स्वतासाठी कधीच उप्योग केला नाही....बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठोसा मारणारा अजुन पर्यंत कोणी जन्मला आलेला नाही आणि भविष्यातही कोण जन्मला येऊ शकणार नाही असे ठणकाहुन उद्धवसाहेबांनी विरिधकांना बजावले.
उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि ’पंतप्रधानपदावर मराठी माणुस बसु शकला नाही याचे नक्कीच दु:ख आहे पण जो मराठी माणुस तुम्हाला पंतप्रधानपदी हवा होता,त्याच्याबद्दल बिल्कुल दु:ख वाटत नाही’ असा जोरदार टोळा उद्धवसाहेबांनी शरद पवारांना लगावला.
परिषद आटपता उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये माझं लक्ष्य कमी झालं हे खरंच आहे पण ग्रामीण भागात आमचा पाया मजबूत झाला.आतापासुन जोमाने कामाला लागा...विधानसभेवर भगवा नक्कीच फडकेल असा आदेश त्यांनी कार्यकरत्यांना दिला.
साभार : शिवसेना अपडेट्स
Subscribe to:
Posts (Atom)