Monday, 29 December 2008

पाकिस्तानी शाळांमधून शिकवला जाणारा इतिहास.

आरिफ मोहम्मद खान यानी लिहिलेले हे लेख छापयची टाइम्स ऑफ़ इंडिया ला २७ दिसम्बर २००८ च्या वर्त्तमानपत्रात छाप बुद्धि झाली म्हणजे अप्रुप म्हणायला हवे . जोपर्यंत बहुसंख्या सामान्य हिन्दू मरत होते तेंव्हाची हिन्दू नेस्तनाबूत करण्याचे विचार उच्चभ्रू , परकीय नागारिकांवर हल्ले झाले तेंव्हा अचानक बदलून गेले. गाढवाच्या तोंडी गीता आली. जे इतके दिवस हिंदुत्ववाद्यांना चुकीचे म्हणत होते त्याना अचानक साक्षात्कार झाला म्हणायचे.

ढोंगी बुद्धिजीवी आणि हिन्दुना अक्कल शिकवणारे, वागणूकीचे धडे देणारे आणि पाकिस्तानात भारता बद्दल खुप चांगली भावना आहे म्हाणणारे यांना ही चपराक आहे. पाकिस्तानात शाळांमधे असा इतिहास शिकवला जातो की ज्या मुले लहान वया पासुनाच "धार्मिक आधारावर" असमानता आणि द्वेष याची शिकवण मिळत राहते. १९७७ पासून पकिस्तान मधे असणारी शाला मधील पुस्तकात भारता बद्दल आणि विशेषत:हिंदूं बद्दल द्वेष शिकवला जातो.

पकिस्तान शिक्षण आणि समाज शात्र या अनिवार्य (compulsory)विषयात इतिहासचा अपलाप करून मोडून तोडून कशी मने आणि विचार घडवले जातात त्याचे हे उदहारण आहे.

इयत्ता ६ वि च्या पुस्तकाच्या प्रस्तावानेतच पाकिस्तानी शिक्षण पद्धतीच्या धेया बद्दल सांगितले गेले आहे ."सामजिक अभ्यास या विषयाला पाकिस्तानी शैक्षणिक धोराणात विशेष महत्त्व दिले गेले आहे कारण सामाजिक समानते ची मूलभूत विचारधारणा तिचा स्वीकार आणि प्रत्यक्षत अमलबजावणी या आधार बळकट होवून व्यक्तिमत्व विकास व्हावा." "सामाजिक एकात्मता " म्हणले आहे राष्ट्रीय एकात्मता " नव्हे.

इयत्ता ५ वि चे पुस्तकात आहे....की हिन्दुनी ब्रिटिशांना त्यांची सत्ता भारतात प्रस्थापितसाठी मदत केली. "ब्रिटिशांना हिंदुस्थानात सत्ता प्रस्थापित करायची होती म्हणुन म्हणुन त्यानी हिन्दुना सामिल करून घेतले आणि हिन्दूना त्याना मदत करण्यात अतिशय आनंद होत होता.ब्रिटिश एक बाजूला संपूर्ण उपखंडात सत्ता प्रस्थापित करून लूट करत होते तर दुसरीकडे हिन्दुन्शी हात मिळवून मुसलमानांना दाबुन टाकत होते."

इयत्ता ८ वि च्या पुस्तकात लिहिले आहे.."मुस्लिम संतांच्या शिकवणीतुन हिंदूंच्या कित्येक अंधश्रद्धा दूर झाल्या आणि वाईट प्रथा बंद झाल्या आणि अश्या प्रकार जुनाट हिन्दू धर्माचा शेवट झाला."

भारत -पाक युद्धा बद्दल : ही पुस्तके खुलेपणाने "जिहाद "आणि "शहादत" यांचा पुरस्कार करतात आणि त्यांचे विस्तृत वर्णन करतात आणि मुलांना "मुजाहिद" बनवून भारता बरोबर कोणतेही संबंध, भावी मैत्री ना ठेवण्याबद्दल सांगतात .


इयत्ता ५ वि चे पुस्तक म्हणते."१९६५ साली पाकिस्तानी सैन्याने भारताचा बराच भूभाग जिंकुन घेतला होता आणि जेव्हा ते हरु लागले तेंव्हा त्यानी यूनो मधे धाव घेतली आणि युद्ध बंदी आनावली. १९६५ नंतर पूर्व पाकिस्तानातीलआणि आपल्या पासून पूर्व पकिस्तान तोडून टाकण्यात आला.म्हणुन आपणा सर्वानी दुश्मन शी लढण्या साठी सैनि हिन्दू नी तिथल्या लोकाना पश्चिम पाकिस्तान तिल लोकंविरुद्ध भाडकवुन अखेरीस दिसम्बर १९७१ मधे पूर्व पाकिस्तानात कब्जा मिलावाला.की शिक्षण घेतले पाहिजे."

**************************************
हा लेख ऑर्कुटवरील एका मित्रांने पोस्ट केलेल्या लेखाची प्रत आहे.

Friday, 26 December 2008

२६ नोव्हेंबर - शिवसैनिकांचे योगदान!

मुंबईत गेल्या महिन्याच्या २६ नोव्हेंबर ला इस्लामी आतंकवाद्यांनी धुमाकुळ घातला होता. कुलाब्याच्या नरिमन हाऊस मध्ये जेव्हा गोळीबार सुरू झाला त्यावेळेस तिथेच असणारे शिवसेना शाखाप्रमुख श्री. विजय सुर्वे यांनी त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना घेऊन निशस्त्र असूनही पोलिस येईपर्यंत आतंकवाद्यांशी निडरपणे लढा दिला. यात दुर्दैवाने तरूण शिवसेना गटप्रमुख हरिश गोयल यांचा गोळी लागून मृत्यु झाला.

दि. २५ डिसेंबरच्या सामनामध्ये याबद्दल एक लेख आलेला आहे. आपण तो इथे क्लिक करून वाचू शकता.

शिवसैनिकांच्या या कामगिरी बद्दल इथे आपल्या प्रतिक्रिया कळवा

Wednesday, 24 December 2008

संघर्ष करा! महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणा!!

"संघर्षाचा काळ कधीच संपत नसतो. प्रसंगानुसार त्याकडे पहावं लागतं. किती झालं तरी, दारूगोळा उगीच फुकट कशाला घालवायचा याचाही विचार करावा लागतो. मी तर सतत संघर्षच केला. संघर्षातून ही आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल."

"आपल्या शिवसेनेवर निष्ठा आहेत, जिद्द आहे. ती महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी हिमतीने वापरा. कडवटपणाने वापरा. त्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मला स्वत:ला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायचीच. त्या निष्ठेने आजपासून कामाला लागा. अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे."

साहेबांनी आज आपणा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती केलेली आहे ती आपण सर्वशक्तीनिशी महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी वापरायची आहे.

साहेबांच्या मुलाखतीचा आजचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

एकच लक्ष्य! विधानसभा २००८

Tuesday, 23 December 2008

"मेणबत्त्या हे शस्त्र आहे काय?" साहेबांचा सवाल

हिंदूंचा दहशतवाद? मला बरे वाटले असते!

हिंदूंमध्ये सुद्धा दहशतवादी निर्माण झाले पाहिजेत, असं वाटायला लागलय मला. नाहितर हे अत्याचार झाले नसते. हिंमत झाली नसती पोलिसांची. हे कसलं लक्षणं? मेणबत्त्या जाळणा-या महिला त्या. त्यांनी कधी कसली आंदोलने केलीत? देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिला, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील महिलांनी केलेली आंदोलनं या महिलांनी पाहिलेली नाहीत. आमच्या शिवसेनेच्या रणरागिणीही महागाईविरूद्ध, अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरतात. त्याला म्हणतात आंदोलन. मेणबत्त्या कसल्या पेटवता?

शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेबांची ज्वलंत मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

बाळासाहेबांची विशेष मुलाखत : भाग १ - आणीबाणी पुकारा!


नपुंसक आणि भडवे देश काय चालवणार?

इराक मध्ये त्या बुशवर का बूट मारला ते समजून घ्या. त्या बूटातून इराकी जनतेचा देशाभिमान, स्वाभिमान दिसतो. बुशला मारलेला जोडा म्हणजे इराकी जनतेचा संताप आहे. पण त्यांच्या अभिमानाचे आपल्याला काय करायचेय? इकडे आमच्या देशाबद्दल आम्हालाच अभिमान नाही.

शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेबांची ज्वलंत मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Monday, 22 December 2008

टाटा इंडिकॉमचा खोड्साळपणा

काहिच महिन्यापूर्वी रिलायंन्स ने आपल्या वेबसाईटवर मुंबई राज्य दाखवले होते. शिवसैनिकांनी त्यांना त्याबद्दल वठणीवर आणले असतानाच "टाटा इंडिकॉम" च्या वेबसाईटवर हाच खोडसाळपणा करण्यात आलेला आहे. आपण स्वत: खालील चित्र पाहू शकता.


आपणास अधिक सोपे जावे यासाठी मी एक लिंक देत आहे आपण स्वत: त्या लिंकवर जाऊन खात्री करून घ्या.
http://www.tataindicom.com/t-personal-internet-plug2surf.aspx

आणी महत्वाचे म्हणजे त्यांनी कोलकाता शहरामधील उपनगरांसाठी "वेस्ट बंगाल" शब्द वापरला असून बंगालमधील इतर शहरांसाठी "रेस्ट ऑफ वेस्ट बंगाल" असे शब्द वापरले आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांचीही माहिती देण्यासाठी त्यांनी "रेस्ट ऑफ महाराष्ट्र" असे म्हंटले आहे.

Saturday, 8 November 2008

चार वर्षे 'विलासा'ची, महाराष्ट्राच्या वनवासाची! (भाग-१)

चार वर्षे 'विलासा'ची, महाराष्ट्राच्या वनवासाची!
आघाडी सरकारच्या निष्क्रियतेवर हल्लाबोल!अस्तित्व शुन्य असलेल्या राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. या चार वर्षात वेळोवेळी सरकारची निष्क्रियता जनतेसमोर आली. या शासनाच्या नाकर्तेपणामुळे विरोधीपक्षनेते मा. रामदासभाई कदम यांनी सरकारचे वाभाडे काढणारी पुस्तिका नुकतीच प्रकाशित केली, तिच पुस्तिका जशीच्या तशी या ब्लॉगवरून सादर करत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या
गेल्या ५ वर्षात राज्यातील ४८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच घडल्या!
शेतकर्‍यांच्या कर्जमाफी पॅकेजचे श्रेय लाटणार्‍या सरकारने या आत्महत्यांची जबाबदारीही स्विकारायला हवी.

शेतकर्‍यांचा घोर अपमान
कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे वजन वाढवण्यासाठी कापसात दगड, धोंडे आणि पाणी टाकतात. असा आरोप करीत एका समारंभात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शेतकर्‍यांची टिंगल केली आणि कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळले. याच समारंभात केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री शंकरलाल वाघेला यांनी महाराष्ट्रातील शेतकरी तंबाखू चोळण्यात वेळ घालवतात, ते आळशी आहेत अशी टवाळी केली. या बेताल आरोपांमुळे आणि टिंगलीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संतप्त झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्लज्जपणे माफी मागितली.

शेतकर्‍यांची अशीही फसवणूक
शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या शेतकर्‍यांना शासनातर्फे कृषिभूषण पुरस्कार दिला जातो. परंतु पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांना देण्यात येणारे सुवर्णपदक बनावट होते. शेतकर्‍यांची हि घोर फसवणूक कशासाठी? स्वाभिमानी शेतकर्‍यांनी ही सुवर्ण पदके शासनाला परत केली. पण या निर्लज्ज आणि कोडग्या सरकारला ना खंत ना खेद! शेतकर्‍यांचा या सरकारने छळवाद चालविला आहे. नाईलाजास्तव शेतकर्‍यांना आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागला. इतकेच नव्हे तर आदिवासींच्या योजनेच्या नावाखाली बनावट मंगळसूत्र वाटण्याचे पाप या सरकारने केले.

शेतकरी विरोधी सरकार आणि काँग्रेसी नेते

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पॅकेज लाटले
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे केंद्रबिंदू असलेल्या विदर्भातील जिल्ह्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री विशेष पॅकेजचा खर्‍या लाभार्थींऐवजी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीच फायदा घेतला. पॅकेजनुसार गायी किंवा म्हशींच्या एकूण खरेदी रकमेपैकी ५० टक्के रक्कम राज्य शासनाने सोसावयाची होती. पण यवतमाळ जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसारः

* काँग्रेसचे माजी खासदार उत्तमराव पाटील व त्यांच्या नातेवाईकांनी १० गायी लाटल्या.
* दिग्रसचे विद्यमान आमदार संजय देशमुख यांची पत्नी व आई यांच्या नावे प्रत्येकी एक गाय.
* नागपूरचे माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या जवळच्या नातेवाईकाने ८ गायी 'मिळवल्या'.
* वणीचे माजी आमदार वामनराव कासावर यांच्या नातेवाईकांनी ८ गायी मिळवल्या.
* काँग्रेसचे नेते सुरेश लोणकर यांनी ६ गायी लाटल्या.
* गायींचा पुरवठा करणारे ठेकेदार अमोल क्षीरसागर हे स्वतः लाभार्थी होते. त्यांनी दोन गायी प्राप्त केल्या.
* १४००० किंमतीच्या हजारो दुभदुभत्या गायी वितरित करूनसुद्धा दुधाचा साठा कमी झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

कापूस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक
पंतप्रधानांनी विदर्भातिल शेतकर्‍यांसाठी २००० साली विशेष पॅकेज जाहिर केले. पण त्याची अंमलबजावणी मात्र धडपणे झाली नाही. उलट त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला. पंतप्रधान विदर्भाच्या दौर्‍यावर असतानाही शेतकर्‍यांचे आत्महत्यासत्र सुरूच होते.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनीच सरकारी प्रशासनाचे पितळ उघडे पाडले आहे. महालेखा परिक्षकांनी पंतप्रधान पॅकेजमधील लाभधारकांच्या मूळ आकडेवारीबाबतच शंका घेतली आहे. पंतप्रधानांनी विदर्भातील १३ लाख ४८ हजार शेतकर्‍यांसाठी ३७५० कोटी रूपयांचे पॅकेज दिले. लाभार्थींची आकडेवारीच संशयास्पद असल्याचे महालेखा परीक्षकांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांचे हे पॅकेज केवळ सहा जिल्ह्यांपुरतेच मर्यादित नव्हते. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना त्याचा फायदा मिळायला हवा होता. बँकानी ९ लाख २९ हजार प्रकरणात व्याजमाफिचा दावा करूनही ४ लाख ४५ हजार प्रकरणात नविन कर्जे देण्यात आलेले नाही. बँकांनी २८ कोटी ९५ लाख रुपयांची चुकिची कर्जमाफि दिली आहे. कारंजा कृषी अधिकार्‍यांनी ११० ऐवजी ३४९ शेतकर्‍यांना बैलखरेदीस कर्ज दिले.
इतकेच नव्हे तर एकूण लाभार्थींपैकी ८५% शेतकर्‍यांकडे शासनाचे प्रतिनिधी पोहचलेच नाहीत. शेतकर्‍यांच्या समस्यांबाबतीत महाराष्ट्र सरकार मुळीच गंभीर नाही हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकर्‍यांना खताचा वेळेवर पुरवठा झाला नाही. सरकारने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली. अखेर शेतकर्‍यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याने सरकारला जाग आली पण शेतकर्‍यांच्या अडचणींकडे सरकार मुळीच लक्ष देत नाही हे जनतेसमोर आले.