Thursday, 1 January 2009

लक्षात ठेवा २००९ सुरू झालेय!

सर्वप्रथम सर्वांना नविन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्याला सुख-समृद्धी आणि भरभराटिचे जावो! हिच ''श्रीं'' चरणी प्रार्थना!

"एकच लक्ष्य'' हा ब्लॉग डिसेंबर २००७ ला सुरू केला. आदरणीय बाळासाहेबांनी केलेल्या "एकच लक्ष्य - विधानसभा २००९'' या आवाहनाचे वर्ष २००९ आज सुरू झालेले आहे. हे आपल्या सर्व शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाचे असे वर्ष असणार आहे. या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानस भेच्या निवडणूका होतील असे म्हटले जात आहे, म्हणजेच आपल्याकडे जीव ओतून काम करण्याचे आता केवळ ७-८ महिनेच उरलेले आहेत. जर या वेळात आपण आणखी मेहनत केली तर विधानसभा जिंकणे सोपे जाईल यात वादच नाही. साहेबांनी सांगितल्यानुसार शिवसेनेची एकहाती सत्ता म्हणजेच किमान १४५ आमदार निवडून आले पाहिजेत हेच लक्ष्य आपले सर्वांचे आहे आणि मा. उद्धवसाहेब यांच्या गरूडभरारीने हे लक्ष्य निश्चित जवळ येत आहे अशी खात्री वाटते.

तत्पूर्वी अतिशय महत्त्वाची अशा लोकसभेच्या निवडणूकाही काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मागच्या साडेचार पेक्षा जास्त वर्षात काँग्रेसप्रणीत ''युपीए'' सरकारने देशाचे अक्षरशः वाटोळे लावण्याचे एककलमी कार्यक्रम हाती घेतलाय असेच वाटते. मनमोहनसिंग सारखा अर्थतज्ञ या देशाचा पंतप्रधान असूनही या सरकारला अर्थच नसल्यासारखे वाटते. सच्चर समितीच्या माध्यमातून असो किंवा ऑक्टोबर २००६ रोजी अफजलगुरूला सुप्रिम कोर्टाने सुनावलेली फाशी रद्द करण्याचे प्रयत्न असो मुस्लिम मतांचे राजकारण करण्यात या केंद्रसरकारने धन्यता मानली आहे. देशात जागोजागी होणार्‍या बॉम्बस्फोटाने देश हादरला पण गृहमंत्री बदलण्यापलिकडे यांची मजल गेलीच नाही. आताही पाकिस्तान एवढ्या धमक्या देत असतानाही आम्हाला युद्ध करायचे नाही. का? तर मुसलमान दुखावला जाईल! असेच ना!

१९९५ ते १९९९ या साडेचार वर्षात शिवसेना-भाजपा सरकारने विकासाची दिशा महाराष्ट्राला दाखवली. त्याचीच पुनरावृत्ती आता झाल्यास महाराष्ट्र पुन्हा नंबर एक वर येईल यात तिळमात्र शंका नाही. मुंबईत ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, साडेचार वर्षे जिवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव, कायदा आणि सुव्यवस्था तसेच स्थानिक आमदारांनी त्यांच्या विभागात चालविलेली धडाकेबाज कामे अश्या बर्‍याचशा गोष्टींमुळे युती सरकार ओळखले गेले. पण त्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील लोक एक मेगावॅट निर्माण न करताही मोफत विजेची अश्वासने देऊन निवडणूका जिंकल्या खर्‍या पण झाले काय? गेले आठ वर्ष महाराष्ट्र अंधारात बुडाला आहे, शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत गेला, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, विकासकामांना खीळ बसली तरीही मंत्र्यांची पोटांचा घेर वाढलेलाच!

मराठीच्या अस्मितेच्या नावाने आता बोंबा मारणारे एवढे वर्षे राजकारणात असूनही कुठे होते हा मराठी माणसाचा प्रश्न आहे. शिवसेना सत्तेत असताना सत्तेचा स्वार्थसाठी वापर करून वरून शिवसेनेच्या नावाने बोंबाबोंब करून मराठी माणसाला भडकविण्याचे कामच या लोकांनी हाती घेतले आहे. परंतु मराठी माणसाला हे पक्के माहित आहे कि जर शिवसेना नसती तर आज मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने जगणे केवळ मुश्किल होते. मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र आहे का असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा शिवसेना मराठी माणूस सर्वच क्षेत्रात पुढे कसा येईल याचा विचार करत होती. मराठी माणसाला मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळत नसताना आंदोलने करून तिथे मराठी माणूस उभा राहिला. भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून नोकर्‍यांमध्ये मराठी माणसावर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडून त्यांचे हक्क मिळवून दिले. ''वडापाव''च्या माध्यमातून रोजगार साखळी निर्माण केली त्यातून बर्‍याच मराठी कुटूंबांना आधार मिळाला. एवढे करूनही कोणी शिवसेनेवर आरोप करत असेल तर त्यासाठी मराठी माणसानेच शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. शिवसेनेच्या नावाने पैसा कमावून कोणी मिल घेतल्या कोणी हॉटेल्स, पेट्रोल पंप घेतले आणि आणखी हाव सुटली तेव्हा बाहेर पडले.

मराठी माणसाची मते फोडून महाराष्ट्रात मराठी माणसाचे सरकार येऊ नये यासाठी बरेच प्रयत्न महाराष्ट्र बनल्यापासूनच केले गेले आहेत आणि करत आहेत. आताचेही बेगडी मराठीप्रेमी मुंबई महानगरपालिकेवरील मराठी माणसाचा, शिवसेनेचा भगवा खाली खेचण्यासाठी काँग्रसी भैय्यासाठी (विरोधीपक्ष नेता राजहंस सिंग) थुंकी झेलायला तयार आहेत. एका तोंडाने मराठीच्या बाता करायच्या दुसर्‍या बाजूने मराठीच्या बोडक्यावर बसवण्यासाठी (किंवा सत्तेच्या लालसेपोटी म्हणू या) काँग्रेसी लांडग्यांना मदत करायची अशी ढोलकी बडवण्याचे एकंदर काम सुरू आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला काम करायचे आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कामे पोहचवून, लोकांची कामे करून शिवसेनेला येत्या विधानसभेत किमान १४५ जागांवर विजयी करण्यासाठी आवाहन करायचेय. शिवसेनेचा फगवा फडकल्यास मराठी माणसाचे भले होईलच परंतु विकास कामांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य बनवायचे आहे.

"मराठी माणसा आपले मत शिवसेनेलाच दे तरच तुझ्या मताची किंमत होईल अन्यथा तेच तुझे मत महाराष्ट्राला पर्यायाने तुला अंधाराच्या खाईत घालायला कारणीभूत ठरेल एवढे लक्षात ठेव. हे वर्ष महाराष्ट्रासाठीही भरभराटीचे जाईल अशी आशा बाळगून या. विचार कर पुरता पक्का! शिवसेना विरोधकांना दे धक्का!''

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Monday, 29 December 2008

पाकिस्तानी शाळांमधून शिकवला जाणारा इतिहास.

आरिफ मोहम्मद खान यानी लिहिलेले हे लेख छापयची टाइम्स ऑफ़ इंडिया ला २७ दिसम्बर २००८ च्या वर्त्तमानपत्रात छाप बुद्धि झाली म्हणजे अप्रुप म्हणायला हवे . जोपर्यंत बहुसंख्या सामान्य हिन्दू मरत होते तेंव्हाची हिन्दू नेस्तनाबूत करण्याचे विचार उच्चभ्रू , परकीय नागारिकांवर हल्ले झाले तेंव्हा अचानक बदलून गेले. गाढवाच्या तोंडी गीता आली. जे इतके दिवस हिंदुत्ववाद्यांना चुकीचे म्हणत होते त्याना अचानक साक्षात्कार झाला म्हणायचे.

ढोंगी बुद्धिजीवी आणि हिन्दुना अक्कल शिकवणारे, वागणूकीचे धडे देणारे आणि पाकिस्तानात भारता बद्दल खुप चांगली भावना आहे म्हाणणारे यांना ही चपराक आहे. पाकिस्तानात शाळांमधे असा इतिहास शिकवला जातो की ज्या मुले लहान वया पासुनाच "धार्मिक आधारावर" असमानता आणि द्वेष याची शिकवण मिळत राहते. १९७७ पासून पकिस्तान मधे असणारी शाला मधील पुस्तकात भारता बद्दल आणि विशेषत:हिंदूं बद्दल द्वेष शिकवला जातो.

पकिस्तान शिक्षण आणि समाज शात्र या अनिवार्य (compulsory)विषयात इतिहासचा अपलाप करून मोडून तोडून कशी मने आणि विचार घडवले जातात त्याचे हे उदहारण आहे.

इयत्ता ६ वि च्या पुस्तकाच्या प्रस्तावानेतच पाकिस्तानी शिक्षण पद्धतीच्या धेया बद्दल सांगितले गेले आहे ."सामजिक अभ्यास या विषयाला पाकिस्तानी शैक्षणिक धोराणात विशेष महत्त्व दिले गेले आहे कारण सामाजिक समानते ची मूलभूत विचारधारणा तिचा स्वीकार आणि प्रत्यक्षत अमलबजावणी या आधार बळकट होवून व्यक्तिमत्व विकास व्हावा." "सामाजिक एकात्मता " म्हणले आहे राष्ट्रीय एकात्मता " नव्हे.

इयत्ता ५ वि चे पुस्तकात आहे....की हिन्दुनी ब्रिटिशांना त्यांची सत्ता भारतात प्रस्थापितसाठी मदत केली. "ब्रिटिशांना हिंदुस्थानात सत्ता प्रस्थापित करायची होती म्हणुन म्हणुन त्यानी हिन्दुना सामिल करून घेतले आणि हिन्दूना त्याना मदत करण्यात अतिशय आनंद होत होता.ब्रिटिश एक बाजूला संपूर्ण उपखंडात सत्ता प्रस्थापित करून लूट करत होते तर दुसरीकडे हिन्दुन्शी हात मिळवून मुसलमानांना दाबुन टाकत होते."

इयत्ता ८ वि च्या पुस्तकात लिहिले आहे.."मुस्लिम संतांच्या शिकवणीतुन हिंदूंच्या कित्येक अंधश्रद्धा दूर झाल्या आणि वाईट प्रथा बंद झाल्या आणि अश्या प्रकार जुनाट हिन्दू धर्माचा शेवट झाला."

भारत -पाक युद्धा बद्दल : ही पुस्तके खुलेपणाने "जिहाद "आणि "शहादत" यांचा पुरस्कार करतात आणि त्यांचे विस्तृत वर्णन करतात आणि मुलांना "मुजाहिद" बनवून भारता बरोबर कोणतेही संबंध, भावी मैत्री ना ठेवण्याबद्दल सांगतात .


इयत्ता ५ वि चे पुस्तक म्हणते."१९६५ साली पाकिस्तानी सैन्याने भारताचा बराच भूभाग जिंकुन घेतला होता आणि जेव्हा ते हरु लागले तेंव्हा त्यानी यूनो मधे धाव घेतली आणि युद्ध बंदी आनावली. १९६५ नंतर पूर्व पाकिस्तानातीलआणि आपल्या पासून पूर्व पकिस्तान तोडून टाकण्यात आला.म्हणुन आपणा सर्वानी दुश्मन शी लढण्या साठी सैनि हिन्दू नी तिथल्या लोकाना पश्चिम पाकिस्तान तिल लोकंविरुद्ध भाडकवुन अखेरीस दिसम्बर १९७१ मधे पूर्व पाकिस्तानात कब्जा मिलावाला.की शिक्षण घेतले पाहिजे."

**************************************
हा लेख ऑर्कुटवरील एका मित्रांने पोस्ट केलेल्या लेखाची प्रत आहे.

Friday, 26 December 2008

२६ नोव्हेंबर - शिवसैनिकांचे योगदान!

मुंबईत गेल्या महिन्याच्या २६ नोव्हेंबर ला इस्लामी आतंकवाद्यांनी धुमाकुळ घातला होता. कुलाब्याच्या नरिमन हाऊस मध्ये जेव्हा गोळीबार सुरू झाला त्यावेळेस तिथेच असणारे शिवसेना शाखाप्रमुख श्री. विजय सुर्वे यांनी त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना घेऊन निशस्त्र असूनही पोलिस येईपर्यंत आतंकवाद्यांशी निडरपणे लढा दिला. यात दुर्दैवाने तरूण शिवसेना गटप्रमुख हरिश गोयल यांचा गोळी लागून मृत्यु झाला.

दि. २५ डिसेंबरच्या सामनामध्ये याबद्दल एक लेख आलेला आहे. आपण तो इथे क्लिक करून वाचू शकता.

शिवसैनिकांच्या या कामगिरी बद्दल इथे आपल्या प्रतिक्रिया कळवा

Wednesday, 24 December 2008

संघर्ष करा! महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणा!!

"संघर्षाचा काळ कधीच संपत नसतो. प्रसंगानुसार त्याकडे पहावं लागतं. किती झालं तरी, दारूगोळा उगीच फुकट कशाला घालवायचा याचाही विचार करावा लागतो. मी तर सतत संघर्षच केला. संघर्षातून ही आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल."

"आपल्या शिवसेनेवर निष्ठा आहेत, जिद्द आहे. ती महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी हिमतीने वापरा. कडवटपणाने वापरा. त्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मला स्वत:ला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायचीच. त्या निष्ठेने आजपासून कामाला लागा. अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे."

साहेबांनी आज आपणा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती केलेली आहे ती आपण सर्वशक्तीनिशी महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी वापरायची आहे.

साहेबांच्या मुलाखतीचा आजचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

एकच लक्ष्य! विधानसभा २००८

Tuesday, 23 December 2008

"मेणबत्त्या हे शस्त्र आहे काय?" साहेबांचा सवाल

हिंदूंचा दहशतवाद? मला बरे वाटले असते!

हिंदूंमध्ये सुद्धा दहशतवादी निर्माण झाले पाहिजेत, असं वाटायला लागलय मला. नाहितर हे अत्याचार झाले नसते. हिंमत झाली नसती पोलिसांची. हे कसलं लक्षणं? मेणबत्त्या जाळणा-या महिला त्या. त्यांनी कधी कसली आंदोलने केलीत? देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिला, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील महिलांनी केलेली आंदोलनं या महिलांनी पाहिलेली नाहीत. आमच्या शिवसेनेच्या रणरागिणीही महागाईविरूद्ध, अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरतात. त्याला म्हणतात आंदोलन. मेणबत्त्या कसल्या पेटवता?

शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेबांची ज्वलंत मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

बाळासाहेबांची विशेष मुलाखत : भाग १ - आणीबाणी पुकारा!


नपुंसक आणि भडवे देश काय चालवणार?

इराक मध्ये त्या बुशवर का बूट मारला ते समजून घ्या. त्या बूटातून इराकी जनतेचा देशाभिमान, स्वाभिमान दिसतो. बुशला मारलेला जोडा म्हणजे इराकी जनतेचा संताप आहे. पण त्यांच्या अभिमानाचे आपल्याला काय करायचेय? इकडे आमच्या देशाबद्दल आम्हालाच अभिमान नाही.

शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेबांची ज्वलंत मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Monday, 22 December 2008

टाटा इंडिकॉमचा खोड्साळपणा

काहिच महिन्यापूर्वी रिलायंन्स ने आपल्या वेबसाईटवर मुंबई राज्य दाखवले होते. शिवसैनिकांनी त्यांना त्याबद्दल वठणीवर आणले असतानाच "टाटा इंडिकॉम" च्या वेबसाईटवर हाच खोडसाळपणा करण्यात आलेला आहे. आपण स्वत: खालील चित्र पाहू शकता.


आपणास अधिक सोपे जावे यासाठी मी एक लिंक देत आहे आपण स्वत: त्या लिंकवर जाऊन खात्री करून घ्या.
http://www.tataindicom.com/t-personal-internet-plug2surf.aspx

आणी महत्वाचे म्हणजे त्यांनी कोलकाता शहरामधील उपनगरांसाठी "वेस्ट बंगाल" शब्द वापरला असून बंगालमधील इतर शहरांसाठी "रेस्ट ऑफ वेस्ट बंगाल" असे शब्द वापरले आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांचीही माहिती देण्यासाठी त्यांनी "रेस्ट ऑफ महाराष्ट्र" असे म्हंटले आहे.