Friday, 18 June 2010

दहावी निकाल मदत केंद्राला भरघोस प्रतिसाद


यंदा दहावीचा निकाल इंटरनेटवरुन जाहिर होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होणार हे स्पष्टच होते. शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे आजच्या अनुभवावरुन लक्षात आले. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांच्या सुत्रानुसार आणि वरील होणारी गैरसोय पाहता हे मदत केंद्र सुरु करण्याचे ठरले  आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रचंड गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या माध्यमातून करता आल्याने खुपच समाधान वाटले.

बारावीप्रमाणेच दहावीचा निकाल सुद्धा प्रथम इंटरनेटवरुन जाहिर करून त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष निकालाची प्रत मिळणार असल्याचे बोर्डाने जाहिर केले. यामुळे सर्वात जास्त गैरसोय राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार होती. हे निकाल शासनाच्या महसुल विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात पाहण्याची सोय शासनाने केली होती. परंतु एका वृत्तपत्रात कोकणाची आकडेवारी आली होती ती अशी, कोकणातील चार जिल्ह्यांत एकूण १३८० तलाठी व ४७ तहसिलदार असून त्यांच्या कार्यालयात इंटरनेट सुविधाच नाही. नव्हे कोकणातील या चार जिल्ह्यात अजून इंटरनेटची सोयच नाही. तर मग शासनवरील आदेश काढून काय करणार होते?

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा आजच्या संपूर्ण दिवसात एकूण ३०८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातूनच फोन करत होते. निकाल केवळ एका फोन कॉलवर मिळत असल्यामुळे अनेक जणांनी शिवसेनेचे आभार सुद्धा मानले आणि भविष्यात असेच काम करत राहाल अशी इच्छाही व्यक्त केली. 

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेने सर्वात प्रथम बारावीसाठी असेच मदत केंद्र सुरु केले आणि आता दहावीसाठी! भविष्यात सुद्धा शिव माहिती व तंत्रज्ञान सेना अशा प्रकारच्या कामात नक्कीच पुढाकार घेईल. आजच्या या कामात शिवसेना ऑर्कुट समुदायावरील प्रत्यक्ष सहभागी आणि अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या शिवसैनिकांचा हातभार लागला तो खुपच मोलाचा होता. अशा सर्व शिवसैनिकांचे आभार!

Saturday, 12 June 2010

राज ठाकरे यांनी केले स्वत:चेच वस्त्रहरण!

परवाच्या विधानपरिषद निवडणूकांमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादीला मदत (पैसे घेतले पण आपण तिला मदतच म्हणू यात) करून टिकेचे धनी ठरलेले मनसे (धनसे)प्रमुख आज अक्षरश: बिथरुन गेले. कालच्या ईसकाळच्या अंकातील मराठी माणसांच्या काही प्रतिक्रिया सामना मध्ये आल्याने राज ठाकरे यांचा पारा चढला आणि आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. अक्षरश: बावचलेल्या अवस्थेत आजची त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यात काय बोलले तर मागच्या वेळचीच टेप पुन्हा वाजवली. यात नविन असे काहिच नव्हते. 

शिवसेनेने अमराठी लोकांना खासदार करण्यापासून ते मराठी भारतकुमार राऊत आणि निलम गोऱ्हेपर्यंत घसरले. मुळात आज त्यांची गाडी रुळावरून चालतच नव्हती. पत्रकारांनी टाकलेल्या बाऊंसर वर अक्षरश: लोटांगण घातले. तेच तेच रटाळ बोलताना काही खऱ्या गोष्टीसुद्धा सांगितल्या. माझे आमदार विधानसभेत आले पाहिजेत म्हणुन कॉंग्रेसला मदत केल्याचे सुद्धा सांगितले. तसेच महानगरपालिकेत सपा शिवसेनेला मदत कशी करते हे सुद्धा सांगायला विसरले नाही.

मुळात यांचे आमदार निलंबीत झालेच का? सर्व मराठी माणसांना माहिती आहे. त्याचा बराचसा गाजावाजा खुद्द राज ठाकरे यांनीच केला आहे. मराठी अस्मितेसाठी माझे आमदार हौतात्म्य सुद्धा पत्करायला तयार आहेत, मग परवा काय तुमच्या या आमदारांच्या मांजरी झाल्या का? लोकांच्या कामांची इतकी काळजी तुम्हाला त्यावेळी होती का? ज्या मराठी माणसांनी तुमच्या आमदारांना निवडून दिले त्या मराठी माणसांच्या मताची जाणिव तेव्हा नाही झाली? मुळात आता तर ते प्रकरण सुद्धा बनाव वाटायला लागले आहे. तु मारल्यासारखा कर मी लागल्यासारखा करतो. हिच तुमची भूमिका. मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड प्रसिद्धी कमवायची आणि 
मराठी माणसालाच फाट्यावर मारायचे हे तुमचे उद्योग काही नविन नाहीत.

परवाच्या विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेचा एक आमदार हरला याचे दु:ख नक्कीच आहे. एक आमदार शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा होता. पण ते होऊ शकले नाही. यासाठी तुमचा मनसे पक्ष जबाबदार आहे असे  मुळीच म्हणणे नाही. तुमचा स्वत:चा पक्ष आहे काय निर्णय घ्यायचे याचाही तुम्हाला अधिकार आहे. पण प्रत्येल वेळेस जे तुम्ही म्हणायचात की या सगळ्या युती-आघाड्यांसारखे मला राजकारण करायचे नाही. माझा पक्ष यांच्यापेक्षा वेगळा आहे. आता तुमचे काय म्हणणे आहे? ते तुम्ही लोकांना सांगितलातच नाहीत. खरेतर आजच्या पत्रकार परिषद हि तुमच्या शिवसेना काविळीचे एक उदाहरणच आहे. शिवसेनेला पराभव पचवता येत नसेलही पण ज्या मराठी मातीशी कॉंग्रेस सतत बेईमानाने वागते त्यांच्या कळपात जाऊन तुम्ही काय मोठे काम केलेत हो?

विधानपरिषदेत यापूर्वी अनेक मोठे लोक बिनविरोध निवडून जायचे. लेखक, कवी, गायक आणि इतर वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोक याच सभागृहाचे आमदार झालेले आहेत. पण आजच्या खाव सुटलेल्या जमान्यात ते चित्र दिसणे केवळ अशक्य आहे. पैशाच्या थैली समोर टाकल्या की राजकारणात सगळे काही मिळते. अशा प्रकारच्या निवडणूकीत घोडेबाजार (की गाढव) होतो हे सगळ्यांना माहित आहे. तरीही राज ठाकरे म्हणत आहेत की केवळ चार आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी आम्हि आघाडीला मतदान केले. पण परवाच तुमचे गटनेते टीव्ही वर हेच सांगायला का कचरत होते? 

राज ठाकरे आज तुम्हीच जगासमोर उघडे झाला आहात! सर्वजण असेच समजत होते की तुम्ही काहितरी वेगळे करत आहात? अर्थात ती गैरसमज दुर तुम्हीच आज केलात ते बरे झाले. शिवसेनेवर टिका केल्यामुळे तुमचा पक्ष एवढा मोठा होऊ शकते म्हणजेच शिवसेनेला किती महत्व आहे तेच बघा. तुम्ही स्वत: आज ज्या उड्या मारत आहात त्या सुद्धा शिवसेनेमुळेच! आज उद्धवसाहेबांनी सांगितलेच आहे जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा!

Wednesday, 14 April 2010

शिवसेना इंटरनेट समुदायाचा मेळावा!

मित्रानो आपण सर्वाना माहीतच असेल कि आपल्या समुदायाचा पहिला मेळावा शिवसेना भवन येथे पार पडला. मेळाव्याला लाभलेला प्रतिसाद फार उत्तम आणि अवर्णनीय होता. काल पर्यंत आपण शिवसेना ऑर्कुट समुदाय ह्या नावाने ओळखलो जात होतो परंतु कालच शिवसेना सचिव विनायक राउत साहेब यांनी सर्व सभासदांना सांगितले कि
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या समुदायाला या पुढे संघटनेचे रूप देण्याचे ठरवले असून
मा. बाळासाहेबानीच आपल्या या समुदायाच्या नवीन संघटनेला " शिव माहिती तंत्रज्ञान सेना " हे नाव दिले आहे..
मित्रानो पक्षाने आपल्यावर फार मोठी जवाबदारी दिली आहे. आजपासूनच सर्व कामाला लागू या आणि शिवसेना या पक्षाच्या वाढीसाठी हातभार लावूया ..

सदर मेळाव्यासाठी शिवसेना सचिव विनायक राउत साहेब, विद्यार्थी सेनेचें अध्यक्ष अभिजित पानसे, राहुलजी खेडेकर, मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे साहेब , अमेरिकेहून खास ह्या मेळाव्याकरिता उपस्थित असेलेले सुनीलजी मंत्री आदी उपस्थित होते..

मेळाव्याची प्रस्तावना आपले समुदाय नियंत्रक अमित चिविलकर यांनी केली. आपल्या समुदायातील अक्षया महाडिक, मेघाताई गावडे, सतीश पानपत्ते, अमोल नाईक यांनी आपले विचार मांडले.
समुद्याची वाटचाल कशी असेल या बाबत श्री. जनार्दन मानकर साहेब यांनी उपस्थितांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या समुदायातील सभासद विशेष राणे यांनी केले.

भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे यांही समुदाय्च्या वाटचाली बाबत समाधान व्यक्त करत यापुढे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे साहेब यांनी सुद्धा समुदायाला गरज लागेल तेव्हा मदतीला उभा असें असे आश्वासन दिले. शिवसेना सचिव विनायक राउत साहेब यांनी आपल्या समुदायाच्या कार्यातून शिवसेना द्वेष्ट्यांचे दात घश्यात घालण्याचे आव्हान केले व त्यांनी समुदायाचे कोडकौतुक हि केले.

Monday, 12 April 2010

ऐतिहासिक क्षणाला काहीच तास उरले!

आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षणाला काहीच तास आता उरले आहेत.. कारण उद्या दुपारी ४ वाजता शिवसेना भवन येथे आपल्या समुदायाचा मेळावा पार पडणार आहे.

२१ व्या युगात इंटरनेट हे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत असताना फक्त आणि फक्त शिवसेना या पक्षाने त्याचे महत्व जाणून इंटरनेट वर कार्यरत असणाऱ्या युवकांना एकत्र करून पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं. इंटरनेट वर काम करणारी मुलंच उद्या समाजोन्नती साठी भरीव कार्य करू शकतात हे शिवसेना कार्यप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेबांनी जाणलं आणि अश्या युवकांना एकत्र आणण्याच काम आपल्या समुदायावर सोपवलं. आणि इंटरनेट हेच येत्या काही काळात प्रभावी माध्यम असेल हि दूरदृष्टी फक्त आणि फक्त उद्धाव्साहेबंकडेच आहे हे मला सांगायला अभिमान वाटत आहे. एका पक्षाचा प्रमुख उद्या मेळाव्यामध्ये तुम्हा आम्हा सामान्य शिवसैनिकाना मार्गदर्शन करणार आहे.

इंटरनेट वर बसलेली मुल फक्त वेळ घालवण्यासाठी त्याचा उपयोग करतात, चाटिंग, मित्रमैत्रिणी वाढवण्यासाठी इंटरनेटचा आजपर्यंत वापर होत होता परंतु शिवसेना या पक्षाने त्याचप्रमाणे उद्धवसाहेबांनी दाखवून दिल कि ह्याच मुलांना योग्य दिशा दाखवली तर हीच मुल एक पक्ष वाढवण्याच काम देखील करू शकतात, तरुणांच्या मूळ भावना उद्धवसाहेबांनी जाणून घेतल्या. मित्रानो उद्या मेळाव्याला येताना विचार करा कि काल पर्यंत आपण कोण होतो ? परंतु फक्त उद्धवसाहेबांन मुळेच उद्यापासून आपण एका पक्षाच्या मुख्य प्रवाहात असणार आहोत.

मित्रानो उद्यापासून आपली जवाबदारी वाढणार आहे कारण उद्यापासून आपण शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेबांचे ज्वलंत विचारांचा इंटरनेट च्या माध्यमातून सर्वत्र प्रचार करणार आहोत.

उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला आता पात्र होण्याची वेळ आली आहे. आपण सर्व निर्धार करूया आणि उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ करूया.

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!

अमोल नाईक

Saturday, 20 March 2010

‘खान’चे असली उद्योग - सामना अग्रलेख

कॉंग्रेस पक्षाचा लाडका शाहरुख खान याचा ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा पडद्यावर कोसळला असला तरी त्या सिनेमाचा हेतू सफल झाला आहे. ‘माय नेम इज खान’ला लोकांनी केव्हाच सिनेमागृहातून खाली उतरवले. पडद्यावर दगडधोंडे मारून खान व त्या करण जोहरची छी: थू: केली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात व देशातही खानाचा ‘गल्ला’ भरला नाही. हा सिनेमा अरब व इस्लामी राष्ट्रांत मात्र भरपूर गाजला. पाकिस्तानात तर शाहरुख खानचा नुसता ‘जय हो’च झाला. पण त्याहीपेक्षा जी एक वेगळी माहिती आता या खानच्या बाबतीत बाहेर आली आहे ती डोके सुन्न करणारी आहे. ‘माय नेम इज खान’ चित्रपट मुसलमान तरुणांना दाखवून त्यांची डोकी भडकवायची व त्यांच्याकडून अतिरेकी कारवाया घडवून आणायच्या अशा प्रकारची योजना धर्मांध मुस्लिमांनी आखल्याचे उघड झाले आहे. हिजबुल, अल-कायदा वगैरे अतिरेकी संघटनांनी याबाबत आखलेली कट-कारस्थाने म्हणजे आणखी एका नव्या ‘जिहाद’ची तयारीच म्हणायला हवी.

अहमदाबादमधील दहशतवादविरोधी पथकाने यासंदर्भात अटक केलेल्या अतिरेक्यांनीच हा गौप्यस्फोट केला. गुजरातमधील काही सिनेमागृहांत अद्यापि ‘माय नेम इज खान’च्या पाट्या झळकत आहेत. या चित्रपटाची असंख्य तिकिटे पकडलेल्या अतिरेक्यांकडे सापडली. ही तिकिटे कशासाठी, असा ‘थर्ड डिग्री’ प्रश्‍न विचारताच पाकनिष्ठ पोपट धडाधडा बोलू लागले, ‘मुस्लिम तरुणांनी हा सिनेमा जास्तीत जास्त पाहावा व त्यांनी हिंदुस्थानविरुद्ध जिहाद पुकारावा. हिंदूंच्या
कत्तली कराव्यात यासाठीच या

सिनेमाचा वापर हिंदुस्थानविरोधी इस्लामी संघटना
करीत आहेत’, असे या पोपटांनी सांगितले. ‘माय नेम इज खान’मध्ये मुस्लिमांची कशी ससेहोलपट होते, ते मुसलमान असल्याने त्यांना अनेक देशांत कसा त्रास होतो, अपमानास्पद वागणुकीचा अनुभव येतो अशा प्रकारचे कथानक असल्याचे सांगितले जाते. खरे-खोटे त्या खानास व त्याच्या कॉंग्रेजी पिलावळीलाच माहीत. आम्ही एरवी काही चांगले चित्रपट अधूनमधून पाहत असतो, पण पाकपे्रमाची उबळ आलेल्या खानाचा हा चित्रपट काही आम्ही पाहिला नाही. त्यामुळे त्या चित्रपटात काय आहे? तो कसा आहे? तो खान आहे की घाण आहे? याबाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही. मात्र चित्रपट कोसळला असला तरी ‘हिजबूल’ वगैरे हिंदुस्थानविरोधी संघटनांना तो खूपच आवडल्याचे त्यांच्या एकंदरीत कारवायांवरून दिसून येत आहे. मुसलमान तरुणांना भडकविण्यासाठी या चित्रपटाचा वापर सुरू आहे. याबाबत त्या करण जोहरला व खानास आता काय म्हणायचे आहे? हिंदूंचा कोथळा काढण्यासाठी मुसलमान तरुणांची डोकी तयार व्हावीत हाच या चित्रपटाचा मुख्य हेतू होता. अहमदाबादमध्ये पकडलेल्या संशयित आरोपीच्या जबानीतून तरी आम्हाला तेच दिसत आहे. मुसलमानांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे आणि त्यांचे हाल होत आहेत असे कथानक कोणी दाखवत असेल व त्यावरून हिंदुस्थानातील मुसलमान तरुणांना कोणी भडकवीत असेल तर त्याबाबत सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. खरंतर अशा प्रकारची कथानके निर्माण करून मुसलमानांना भडकविण्याचे उद्योग कुणी या देशात तरी करू नयेत. येथील मुसलमानांचा कोणीही अपमान करीत नाही व त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत नाही. या देशाचे नाव भले ‘हिंदुस्थान’ असेल, पण येथे फक्त मुसलमानांचीच चलती आहे. पाकिस्तानात मुसलमानांचे जेवढे लाडकोड होत नसतील त्यापेक्षा जास्त संरक्षण आणि दौलतजादा येथील मुसलमानांवर होत आहे. देशद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या अफझल गुरूलाही कॉंग्रेसवाल्यांनी जीवनदान दिले ते फक्त मुसलमान असल्यामुळेच.  पाक क्रिकेटपटूंसाठी पायघड्या घालणार्‍या शाहरुख खानलाही आमच्या राज्यकर्त्यांनी

22 हजार पोलिसांचे संरक्षण
दिलेच ना? तुमच्या गळ्याभोवतीचा फास सोडवण्याची हिंमत फक्त हिंदुस्थानातच दाखवली जाऊ शकते. कारण शेवटी तुम्ही मुसलमान आहात ना? या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार फक्त मुसलमानांचाच राहील अशी घोषणा ज्या देशाचे पंतप्रधान करतात त्या देशात मुसलमानांचा अपमान होतो असे कोणत्या तोंडाने सांगता? ‘माय नेम इज खान’साठी व खासकरून त्या पाकड्या क्रिकेटपटूंसाठी अशोक चव्हाण हे शाहरुख खानचे बॉडीगार्डच बनले होते. काय त्याचे विमानतळावर स्वागत, काय त्याच्या बंगल्यास पोलिसांचा गराडा, काय त्याचा टीव्ही चॅनलवर उदोउदो! जणू हे कोणी राष्ट्रनिष्ठ क्रांतिकारकच निर्माण झाले हो! मुसलमान म्हणून तुम्हाला जे आज हिंदुस्थानात मिळत आहे ते पाकिस्तानात जन्माला आला असता तर मिळाले असते काय? पाकिस्तानातील उरल्यासुरल्या हिंदूंसाठी तेथील राज्यकर्त्यांनी एखादा ‘सच्चर’ आयोग नेमून शे-पाचशे कोटींची बरसात केली असेल तर सांगावे. कश्मीर खोर्‍यात हिंदूंच्या कत्तली झाल्या, कश्मिरी पंडितांना घरेदारे सोडून पळावे लागले. शेकडो देवळांचा विध्वंस झाला याचे चित्रीकरण करून दाखवायचे म्हटले तर ‘हिंदूंना’ चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आमच्यावर खटले दाखल करतील. मग ज्या ‘खान’ चित्रपटावरून मुसलमानांची डोकी भडकविण्याचे उद्योग चालले आहेत त्याबाबत शाहरुख खानचे बॉडीगार्ड बनलेले अशोक चव्हाण, तिकडे नरेंद्र मोदी कोणती कारवाई करणार? की खान व त्याच्या पिलावळीला आणखी बळ देणार? महाराष्ट्र सरकारकडून अशा कारवाईची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. आता नरेंद्र मोदींनीच काही करावे.

Sunday, 14 March 2010

विंदांना भावपूर्ण आदरांजली..


गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन २००३ साली गौरवण्यात आले होते. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक ठरले. त्याशिवाय कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार तसेच विद्यापीठांच्या डी.लिटस् अशा पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

विंदांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवण गावी झाली. विंदाचे वडिल 'विनायक करंदीकर' कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. संघ ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास राहीला. पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाही. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजिक कार्यात सक्रीय असतात. तसेच त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

विंदांचे समग्र वाङ्मय

विंदानी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या रंजक, वैचारीक, काव्यलेखनाने भर घातली. मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामान्यापर्यंत पोहचेल असे पाहीले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांचे कडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषेस परिचय झाला. हा त्यांचा साहित्यिक प्रवास त्यांनी इ.स. १९८१ साली लेखन निवृत्ती घेउन यशस्वीपणे पूर्ण केला.

स्वेदगंगा (इ.स. १९४९), मृद्गंध (इ.स. १९५४), धृपद (इ.स. १९५९), जातक (इ.स. १९६८), विरूपिका (इ.स. १९८१), अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार) असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह गाजले. त्याशिवाय संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर), आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष) या संकलित काव्यसंग्रहासाठीही त्यांनी योगदान दिले. विंदांच्या बालकविता खूपच गाजल्या. राणीची बाग (इ.स. १९६१), एकदा काय झाले (इ.स. १९६१), सशाचे कान (इ.स. १९६३), एटू लोकांचा देश (इ.स. १९६३), परी ग परी (इ.स. १९६५), अजबखाना (इ.स. १९७४), सर्कसवाला (इ.स. १९७५), पिशीमावशी आणि तिची भुतावळ (इ.स. १९८१), अडम् तडम् (इ.स. १९८५), टॉप (इ.स. १९९३), सात एके सात (इ.स. १९९३), बागुलबोवा (इ.स. १९९३) अशा बालसाहित्यातून त्यांनी मुलांचे मनोरंजन केले.

धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स


Friday, 5 March 2010

’भारत श्री’चा पगार कमी; अमेरिकेने विसा नाकारला!!


महाराष्ट्रातील मुले मेहनती नाहीत, त्यांना मेहनत करायचे माहित नाही. म्हणून परप्रांतिय इकडे येऊन आपल्या नोकऱ्या बळकावतात.

सुहास खामकर बॉडी बिल्डींग मध्ये सलग चार वेळा ’भारत श्री’ पटकावणाऱ्या आणि ’शिव छत्रपती पुरस्कार’ विजेत्या खेळाडूचे काय?

सुहास खामकर रेल्वे मध्ये टी.सी. म्हणून काम करतो. दरमहा रू. १२०००/- पगार मिळतो. टी.सी. ना दिवस आणी रात्रपाळी असे काम करावे लागते, तरीही बॉडी बिल्डींग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे, हिंदुस्थान आणि महाराष्ट्राचे नाव मोठं करायचं, हिच त्याची धडपड रात्रंदिवस सुरू असते.

शेवटी ती वेळही आली, अमेरिकेत ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धा (कोलंबस, ओहियो) मध्ये भाग घ्यायचा होता. पण अमेरिकन दुतावासाने या आठवड्यात दोन वेळा त्याचा विसा नाकारला. का? कारण पगार कमी आहे...

सुहासने सरळ मुख्यमंत्री कार्यालयात धाव घेतली, पण मुख्यमंत्र्यांनीही त्याला भेट देण्याचे नाकारले. तसेच कोंबडीचोर नारोबाकडेही त्याने धाव घेतली पण त्या नारोबाकडेही सुहाससाठी वेळ नव्हती.

कसले हे भिकार सरकार? कुठे आहेत आपले महाराष्ट्राचे आणि देशाचे क्रिडामंत्री? सुहाससारख्या जीवतोड मेहनत घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात नसेल तर आणखी कोणाला हे देणार आहेत?

सुहास खामकरला ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आलेले निमंत्रण :


सुहास आता येत्या जुन मध्ये होणाऱ्या आशियाई बॉडी बिल्डींग स्पर्धेची तयारी करतोय. प्रायोजक नसल्याने त्याच्या तुटपुंज्या पगारातून त्याला स्वत:चे पैसे खर्च करावे लागत आहेत. सरकार मदत देवो वा न देवो महाराष्ट्रातील सर्व तरूणांनी सुहासच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या परीने सुहासला मदत करू या.

आपण सुहासला थेट त्याच्या मोबाईल वर संपर्क करू शकता किंवा ईमेल द्वारे त्याला कळवू शकता

सुहासचा मोबाईल नंबर आहे +९१-९८९२६८४९२१

ईमेल आहे : suhas.khamkar@yahoo.com