Tuesday 8 July, 2008

नानांना विनम्र अभिवादन

|| श्रीराम समर्थ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||


जेष्ठ निरुपणकार आणि महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे आज पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. नानांच्या जाण्याने जगातील लाखो समर्थ सेवकांमध्ये शोककळा पसरली आहे.

नानांनी दासबोधाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये बैठका चालवून आपले कार्य सुरू केले. मौखिक निरूपणाद्वारे व्यसनमुक्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रीयांवरील अत्याचार, बालसंस्कार केंद्र, प्रौढ शिक्षण आणि वृक्षारोपण आदि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला समाजाला सन्मार्गाला नेण्याचे कार्य केले. नानांना रायगड भूषण, शिव-समर्थ, डि-लिट तसेच हल्लीच महाराष्ट्र भूषण इत्यादी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलेले आहे. कुठल्याही प्रसिद्धीशिवाय समर्थांच्या बैठका गेली ६५ वर्षे अखंडपणे सुरू आहेत.

नानांना माझ्या कुटुंबियांतर्फे भावपूर्ण आदरांजली!

No comments:

Post a Comment