Monday 12 April, 2010

ऐतिहासिक क्षणाला काहीच तास उरले!

आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षणाला काहीच तास आता उरले आहेत.. कारण उद्या दुपारी ४ वाजता शिवसेना भवन येथे आपल्या समुदायाचा मेळावा पार पडणार आहे.

२१ व्या युगात इंटरनेट हे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत असताना फक्त आणि फक्त शिवसेना या पक्षाने त्याचे महत्व जाणून इंटरनेट वर कार्यरत असणाऱ्या युवकांना एकत्र करून पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं. इंटरनेट वर काम करणारी मुलंच उद्या समाजोन्नती साठी भरीव कार्य करू शकतात हे शिवसेना कार्यप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेबांनी जाणलं आणि अश्या युवकांना एकत्र आणण्याच काम आपल्या समुदायावर सोपवलं. आणि इंटरनेट हेच येत्या काही काळात प्रभावी माध्यम असेल हि दूरदृष्टी फक्त आणि फक्त उद्धाव्साहेबंकडेच आहे हे मला सांगायला अभिमान वाटत आहे. एका पक्षाचा प्रमुख उद्या मेळाव्यामध्ये तुम्हा आम्हा सामान्य शिवसैनिकाना मार्गदर्शन करणार आहे.

इंटरनेट वर बसलेली मुल फक्त वेळ घालवण्यासाठी त्याचा उपयोग करतात, चाटिंग, मित्रमैत्रिणी वाढवण्यासाठी इंटरनेटचा आजपर्यंत वापर होत होता परंतु शिवसेना या पक्षाने त्याचप्रमाणे उद्धवसाहेबांनी दाखवून दिल कि ह्याच मुलांना योग्य दिशा दाखवली तर हीच मुल एक पक्ष वाढवण्याच काम देखील करू शकतात, तरुणांच्या मूळ भावना उद्धवसाहेबांनी जाणून घेतल्या. मित्रानो उद्या मेळाव्याला येताना विचार करा कि काल पर्यंत आपण कोण होतो ? परंतु फक्त उद्धवसाहेबांन मुळेच उद्यापासून आपण एका पक्षाच्या मुख्य प्रवाहात असणार आहोत.

मित्रानो उद्यापासून आपली जवाबदारी वाढणार आहे कारण उद्यापासून आपण शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेबांचे ज्वलंत विचारांचा इंटरनेट च्या माध्यमातून सर्वत्र प्रचार करणार आहोत.

उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला आता पात्र होण्याची वेळ आली आहे. आपण सर्व निर्धार करूया आणि उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ करूया.

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!

अमोल नाईक

No comments:

Post a Comment