Thursday 1 January, 2009

लक्षात ठेवा २००९ सुरू झालेय!

सर्वप्रथम सर्वांना नविन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्याला सुख-समृद्धी आणि भरभराटिचे जावो! हिच ''श्रीं'' चरणी प्रार्थना!

"एकच लक्ष्य'' हा ब्लॉग डिसेंबर २००७ ला सुरू केला. आदरणीय बाळासाहेबांनी केलेल्या "एकच लक्ष्य - विधानसभा २००९'' या आवाहनाचे वर्ष २००९ आज सुरू झालेले आहे. हे आपल्या सर्व शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाचे असे वर्ष असणार आहे. या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानस भेच्या निवडणूका होतील असे म्हटले जात आहे, म्हणजेच आपल्याकडे जीव ओतून काम करण्याचे आता केवळ ७-८ महिनेच उरलेले आहेत. जर या वेळात आपण आणखी मेहनत केली तर विधानसभा जिंकणे सोपे जाईल यात वादच नाही. साहेबांनी सांगितल्यानुसार शिवसेनेची एकहाती सत्ता म्हणजेच किमान १४५ आमदार निवडून आले पाहिजेत हेच लक्ष्य आपले सर्वांचे आहे आणि मा. उद्धवसाहेब यांच्या गरूडभरारीने हे लक्ष्य निश्चित जवळ येत आहे अशी खात्री वाटते.

तत्पूर्वी अतिशय महत्त्वाची अशा लोकसभेच्या निवडणूकाही काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मागच्या साडेचार पेक्षा जास्त वर्षात काँग्रेसप्रणीत ''युपीए'' सरकारने देशाचे अक्षरशः वाटोळे लावण्याचे एककलमी कार्यक्रम हाती घेतलाय असेच वाटते. मनमोहनसिंग सारखा अर्थतज्ञ या देशाचा पंतप्रधान असूनही या सरकारला अर्थच नसल्यासारखे वाटते. सच्चर समितीच्या माध्यमातून असो किंवा ऑक्टोबर २००६ रोजी अफजलगुरूला सुप्रिम कोर्टाने सुनावलेली फाशी रद्द करण्याचे प्रयत्न असो मुस्लिम मतांचे राजकारण करण्यात या केंद्रसरकारने धन्यता मानली आहे. देशात जागोजागी होणार्‍या बॉम्बस्फोटाने देश हादरला पण गृहमंत्री बदलण्यापलिकडे यांची मजल गेलीच नाही. आताही पाकिस्तान एवढ्या धमक्या देत असतानाही आम्हाला युद्ध करायचे नाही. का? तर मुसलमान दुखावला जाईल! असेच ना!

१९९५ ते १९९९ या साडेचार वर्षात शिवसेना-भाजपा सरकारने विकासाची दिशा महाराष्ट्राला दाखवली. त्याचीच पुनरावृत्ती आता झाल्यास महाराष्ट्र पुन्हा नंबर एक वर येईल यात तिळमात्र शंका नाही. मुंबईत ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, साडेचार वर्षे जिवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव, कायदा आणि सुव्यवस्था तसेच स्थानिक आमदारांनी त्यांच्या विभागात चालविलेली धडाकेबाज कामे अश्या बर्‍याचशा गोष्टींमुळे युती सरकार ओळखले गेले. पण त्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील लोक एक मेगावॅट निर्माण न करताही मोफत विजेची अश्वासने देऊन निवडणूका जिंकल्या खर्‍या पण झाले काय? गेले आठ वर्ष महाराष्ट्र अंधारात बुडाला आहे, शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत गेला, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, विकासकामांना खीळ बसली तरीही मंत्र्यांची पोटांचा घेर वाढलेलाच!

मराठीच्या अस्मितेच्या नावाने आता बोंबा मारणारे एवढे वर्षे राजकारणात असूनही कुठे होते हा मराठी माणसाचा प्रश्न आहे. शिवसेना सत्तेत असताना सत्तेचा स्वार्थसाठी वापर करून वरून शिवसेनेच्या नावाने बोंबाबोंब करून मराठी माणसाला भडकविण्याचे कामच या लोकांनी हाती घेतले आहे. परंतु मराठी माणसाला हे पक्के माहित आहे कि जर शिवसेना नसती तर आज मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने जगणे केवळ मुश्किल होते. मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र आहे का असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा शिवसेना मराठी माणूस सर्वच क्षेत्रात पुढे कसा येईल याचा विचार करत होती. मराठी माणसाला मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळत नसताना आंदोलने करून तिथे मराठी माणूस उभा राहिला. भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून नोकर्‍यांमध्ये मराठी माणसावर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडून त्यांचे हक्क मिळवून दिले. ''वडापाव''च्या माध्यमातून रोजगार साखळी निर्माण केली त्यातून बर्‍याच मराठी कुटूंबांना आधार मिळाला. एवढे करूनही कोणी शिवसेनेवर आरोप करत असेल तर त्यासाठी मराठी माणसानेच शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. शिवसेनेच्या नावाने पैसा कमावून कोणी मिल घेतल्या कोणी हॉटेल्स, पेट्रोल पंप घेतले आणि आणखी हाव सुटली तेव्हा बाहेर पडले.

मराठी माणसाची मते फोडून महाराष्ट्रात मराठी माणसाचे सरकार येऊ नये यासाठी बरेच प्रयत्न महाराष्ट्र बनल्यापासूनच केले गेले आहेत आणि करत आहेत. आताचेही बेगडी मराठीप्रेमी मुंबई महानगरपालिकेवरील मराठी माणसाचा, शिवसेनेचा भगवा खाली खेचण्यासाठी काँग्रसी भैय्यासाठी (विरोधीपक्ष नेता राजहंस सिंग) थुंकी झेलायला तयार आहेत. एका तोंडाने मराठीच्या बाता करायच्या दुसर्‍या बाजूने मराठीच्या बोडक्यावर बसवण्यासाठी (किंवा सत्तेच्या लालसेपोटी म्हणू या) काँग्रेसी लांडग्यांना मदत करायची अशी ढोलकी बडवण्याचे एकंदर काम सुरू आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला काम करायचे आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कामे पोहचवून, लोकांची कामे करून शिवसेनेला येत्या विधानसभेत किमान १४५ जागांवर विजयी करण्यासाठी आवाहन करायचेय. शिवसेनेचा फगवा फडकल्यास मराठी माणसाचे भले होईलच परंतु विकास कामांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य बनवायचे आहे.

"मराठी माणसा आपले मत शिवसेनेलाच दे तरच तुझ्या मताची किंमत होईल अन्यथा तेच तुझे मत महाराष्ट्राला पर्यायाने तुला अंधाराच्या खाईत घालायला कारणीभूत ठरेल एवढे लक्षात ठेव. हे वर्ष महाराष्ट्रासाठीही भरभराटीचे जाईल अशी आशा बाळगून या. विचार कर पुरता पक्का! शिवसेना विरोधकांना दे धक्का!''

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

No comments:

Post a Comment