Tuesday 22 September, 2009

महाराष्ट्राचा लालू

हल्ली निवडणूका असल्याने कोण काय बोलेल काय नाही याचा पत्ता नाही. पण देशाचे माजी रेल्वे मंत्री म्हणजे काही औरच! महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत रामदास आठवले यांना महाराष्ट्राचे लालू म्हटले जायचे, पण आता नविन लालूही तयार आहे. काल महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहिर करताना असेच उसणे अवसान आणून लालूछाप जोक मारून खिदळत होता.

म्हणे विक्रोळीमध्ये आमचा जास्त जोर असल्यानेच शिवसेनेने पहिली प्रचारसभा तिथे घेतली. काय म्हणावे याच्या मडक्याला? कांदे-बटाटे महाग झाल्याने याचे मडके रिकामेच असले पाहिजे. होय! कॉंग्रेस शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू आहे हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. कारण शिवसेना महाराष्ट्रातील एक नंबरचा विरोधी पक्ष आहे. शिवसेना सत्तेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. शिवसेनेला कुठल्याही उमेदवाराला पाडायचे नसून कॉंग्रेसला गाडायचेय. शिवसेनेने काय करावे काय करू नये हे सांगणारा तु कोण टिनपाट? तुझे काय संबंध शिवसेनेशी? काही नाही ना! मग थोबाड बंद कर. उद्धवसाहेबांनी मागे काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे शोधली नाही आणि चालला आपला पुढे पुढे करायला!

काही दिवसांपूर्वी आदित्यचा गोरेगाव मध्ये केलेला सत्कार पाहून याच्या भुवया ताणल्या गेल्या म्हणे मला हेच आवडत नाही. तुझ्या आवडी-निवडीशी आम्हाला काय करायचेय. पण एवढ्याशा आदित्यचा तु कशाला धसका घेतो आहेस? त्याने निदान विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलेल आहे, तुझं काय? तु लक्ष दे तो निरुपम काय बोलतोय तिकडे. कारण त्याच्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला कॉंग्रेस पैसे देणार नाही. विधानसभेला लाखा-लाखाने घेतलेस ना, आता कोटी-कोटी घ्यायचेत ना?

म्हणे करायला चाललाय महाराष्ट्राचे नवनिर्माण! हे कसले नवनिर्माण हे तर मराठी माणसाचे महानिर्वाण आहे. होय मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करायला निघालेल्या कॉंग्रेसचे जातीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठीच तुझी निवड कॉंग्रेसने केलेली आहे. कॉंग्रेसने स्क्रिप्ट लिहायची आणि तु त्याप्रमाणे चालायचे. आणि मराठी माणसाला सांगायचे "आंदोलने कशाला हवीत? धमक्या दिल्यानेही प्रश्न मिटतात?" मग असे किती प्रश्न मिटवले तु? किती लोकांना काम दिले? शिव उद्योग सेनेच्या नावात उद्योग असताना नोकऱ्यांसाठी पैसे घेतले त्यातले कितीजण अजून काम करत आहेत?

नुसती बडबड करणारा लालू आणि या महाशयांमध्ये कितीसा फरक आहे? सगळीकडे हशा चाललाय, तेही मराठी माणसाच्या दुर्दशेवरच!

2 comments:

  1. barobar mhanat aahat tumi hach maharashtracha bihar karnar aahe dufali majwun marathi manasanmadhe

    ReplyDelete
  2. barobar bolat aahat tumi hach maharatra cha bihar kar nar aahe

    marathi manasanmadhe fut padun

    ReplyDelete