Saturday 5 September, 2009

महाराजांनी खानाचा कोथळा काढला होता?

यावर ऑर्कुट शिवसेना कम्युनिटी सभासद नचिकेत गुरव यांचा लेख पुढीलप्रमाणे :
वास्तवात आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला. खरेतर शिवराय अणि अफझलखान यांच्यात काका-पुतण्याचे नाते होते. पुतन्याच्या भेटीच्या ओढीनेच अफझलखान विजापूरहून शिवरायाना भेटायला प्रतापगडावर आला होता. शिवरायाना पाहताच त्याला प्रेमाचा उमाला आला व त्याने गलाभेटीसाठी शिवरायाना आलिंगन दिले. शिवरायांचा मुळात स्वभावच विनोदी होता. त्यानी खानास गुदगुल्या करण्यास सुरवात केली. खानाचे शारीर प्रचंड असल्याने त्याला कोलेस्ट्रोलची समस्या होती. त्यामुले अति हसण्याने त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्याचा मृत्यु झाला. हा खरा इतिहास आहे.

दूसरा प्रसंग शाहिस्तेखान बाबत आहे. याची बोटे शिवरायानी छाटली असे म्हंटले जाते ते ही चुकीचे आहे.

खरेतर येथे ही खान व शिवराय यांच्यात मामा-भाच्याचे नाते होते ( मित्र औरंग्याचा मामा तो आपला मामा या नात्याने ). येथेही अपनास असे चुकीचे शिकवले गेले की खानाने शिवरायांचे घर बलकावले. आता मामा भाच्याच्या घरी राहणार नाही तर कोणाच्या घरी राहणार ? त्याचा तो हक्क नाही का ? असो मग एक दिवस शिवराय मामाला भेटायला लाल महालात गेले. जेवण व हवा-पाण्याची चर्चा झाल्यावर, शिवरायानी मामाला तलवारीचे दावपेच शिकाविन्याचा अग्रह केला. आता भाच्याचे मन मोडवेना म्हनून मामने दावपेच शिकवन्यास प्रारंभ केला त्यात एक डाव शिकवताना चुकून शिवरायांची तलवार खानच्या बोटाला लागली त्यात त्याची बोटे तुटली. शिवरायानी यावर धावपळ करुन मामासाठी चांगला वैद्य अनन्यासाठी मामाच्या छावनी बाहेर धाव ही घेतली होती. पण चांगला वैद्य मिळाला नाही म्हनून मामाला आता कसे तोंड दाखवू म्हनून ते परत मामाच्या छावनित गेले नाही.

हा खरा इतिहास आहे. म्हनुनच अफझलवधाचा प्रसंग अपल्या सरकारने पाठ्यपुस्तकातून वगळला.

No comments:

Post a Comment