Friday 18 June, 2010

दहावी निकाल मदत केंद्राला भरघोस प्रतिसाद


यंदा दहावीचा निकाल इंटरनेटवरुन जाहिर होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होणार हे स्पष्टच होते. शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे आजच्या अनुभवावरुन लक्षात आले. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांच्या सुत्रानुसार आणि वरील होणारी गैरसोय पाहता हे मदत केंद्र सुरु करण्याचे ठरले  आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रचंड गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या माध्यमातून करता आल्याने खुपच समाधान वाटले.

बारावीप्रमाणेच दहावीचा निकाल सुद्धा प्रथम इंटरनेटवरुन जाहिर करून त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष निकालाची प्रत मिळणार असल्याचे बोर्डाने जाहिर केले. यामुळे सर्वात जास्त गैरसोय राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार होती. हे निकाल शासनाच्या महसुल विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात पाहण्याची सोय शासनाने केली होती. परंतु एका वृत्तपत्रात कोकणाची आकडेवारी आली होती ती अशी, कोकणातील चार जिल्ह्यांत एकूण १३८० तलाठी व ४७ तहसिलदार असून त्यांच्या कार्यालयात इंटरनेट सुविधाच नाही. नव्हे कोकणातील या चार जिल्ह्यात अजून इंटरनेटची सोयच नाही. तर मग शासनवरील आदेश काढून काय करणार होते?

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा आजच्या संपूर्ण दिवसात एकूण ३०८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातूनच फोन करत होते. निकाल केवळ एका फोन कॉलवर मिळत असल्यामुळे अनेक जणांनी शिवसेनेचे आभार सुद्धा मानले आणि भविष्यात असेच काम करत राहाल अशी इच्छाही व्यक्त केली. 

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेने सर्वात प्रथम बारावीसाठी असेच मदत केंद्र सुरु केले आणि आता दहावीसाठी! भविष्यात सुद्धा शिव माहिती व तंत्रज्ञान सेना अशा प्रकारच्या कामात नक्कीच पुढाकार घेईल. आजच्या या कामात शिवसेना ऑर्कुट समुदायावरील प्रत्यक्ष सहभागी आणि अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या शिवसैनिकांचा हातभार लागला तो खुपच मोलाचा होता. अशा सर्व शिवसैनिकांचे आभार!

No comments:

Post a Comment